• Sat. Jun 6th, 2026
    Akola Accident : गणपती विसर्जन करुन परतताना काळाची झडप, भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा

    Akola Accident : गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांना पातूर-अकोला रस्त्यावर एक भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात अकोल्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.

    अकोल गणपती विसर्जन अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : गेल्या 10 दिवसांपासून राज्यात गणेश उत्साहाची धूम होती. आज बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला. मोठ्या भक्तिभावाने 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर आज विसर्जन करण्यात आलं. मात्र विसर्जनावेळी भक्तांवर काळाने घाला घातला. कापशी येथून गणेश विसर्जन करून घरी परतणाऱ्या भक्तांच्या दुचाकीला कारची जोरदार धडक लागली आणि अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथील अवघ्या 30 वर्षाचा रामचंद्र आंधळे याचा मृत्यू झाला. रामचंद्रचा अपघाती मृत्यू झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. अकोल्यातील कापशी येथील उड्डाण पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सर्व्हिस रस्ता नसल्यानं वाहनचालक विरुद्ध दिशेनं वाहन काढतात. अशात समोरून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.

    भक्तिभावाने 10 दिवस गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर आज निरोप द्यायचा दिवस होता. मात्र नियतिने वेगळाच डाव मांडला होता. अकोल्यातील दोन गणेश भक्त कापशी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी गेले होते. गणेश विसर्जन करून दोघे मित्र मोटरसायकलने घरी परतत असताना समोर येणाऱ्या कारची धडक लागली आणि अपघातात एकाच मृत्यू झाला तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र आंधळे आणि त्याचा मित्र विक्की माळी गणेश विसर्जनासाठी अकोला शहरापासून जवळच असलेल्या कापशी तलावावर गेले होते. गणेश विसर्जन करून परतताना कारने धडक दिली. त्यात रामचंद्र आंधळेचा मृत्यू झाला, तर विक्की माळी गंभीर जखमी झाला आहे.

    Maharashtra TimesDhananjay Munde : बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? धनंजय मुंडेंचा रोकडा सवाल

    अकोला ते पातूर मार्गावर काही दिवसांपूर्वी उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. रस्त्यावरील गावांसाठी सर्व्हिस रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कापशी गावातून एका बाजूचा सर्व्हिस रोड अजूनही प्रलंबित आहे. हा सर्व्हिस रोड नसल्यानं वाहनचालक विरुद्धदिशेनं वाहने काढतात, त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात झाले आहेत. आज रामचंद्र आणि त्याच्या मित्राचाही असाच अपघात झाला. दोघेही विरुद्धदिशेने नसते तर हा अपघात घडला नसता. पण सर्व्हिस रोडच नसल्याने नाईलाजाने वाहन चालकांना तशी वाहनं चालवावी लागतात. हा सर्व्हिस रोड व्हावी ही मागणी अनेक दिवसांपासून धूळ खात आहे. पण अजूनही सर्व्हिस रोड संदर्भात कुठलीही हालचाल दिसत नाही. पोलिस या अपघात प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा