• Mon. Mar 16th, 2026
    44 राजकीय निवडणूक आयोगाची नोटीस, महाराष्ट्रातून नोंदणी रद्द होण्याची भीती

    Election Commission : महाराष्ट्रातील काही अप्रमाणित राजकीय पक्षांनी 2019 पासून झालेल्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नाहीत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : 2019 पासून आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि इतर पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा न केल्याने राज्यातील 44 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षांमध्ये आम जनता पार्टीसह, अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. या सर्व पक्षांना तातडीने खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

    राज्यातील काही अप्रमाणित राजकीय पक्षांनी 2019 पासून झालेल्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नाहीत. त्यामुळे या पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा विचार आयोगाकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारे निवडणूक न लढविणारे राज्यात 44 पक्ष असल्याची माहिती आयोगाच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यामुळे या पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
    Maharashtra TimesNilesh Rane : कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून निलंबन, निलेश राणे खवळले, म्हणाले राणे साहेब ज्या दिवशी…

    मोठा धक्का

    आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नशीब आजमावू इच्छिणाऱ्या पक्षांसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. हे पक्ष निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर नेमका काय खुलासा करणार, आणि त्यावर आयोगाची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आयोगाचं समाधान न झाल्यास नेमक्या कुठल्या प्रकारची कारवाई होणार, हेही उत्सुकतेचं आहे.

    मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलन करणं थांबवा, भुजबळांचं ओबीसी नेत्यांना आवाहन

    Maharashtra TimesMaharashtra Politics : राजकारणाला कंटाळून एकनाथ शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, भाजपने डाव साधला, तिघांचा पक्षप्रवेश

    कोणकोणत्या पक्षांचा समावेश?

    या सर्व पक्षांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी 10 आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे. या राजकीय पक्षांमध्ये आम जनता पार्टीसोबतच अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी, अखिल भारतीय लोकाधिकार पार्टी, ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भारत जनसंग्राम पार्टी, भारत उदय मिशन, भारतीय परिवर्तन काँग्रेस, भारतीय जनहित काँग्रेस पार्टी आदींसह 44 राजकीय पक्षांचा समावेश आहे.गेल्या 2019 पासून आतापर्यंत लोकसभा, विधानसभा किंवा इतर कुठल्याही पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा न केल्याने राज्यातील या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व पक्षांना तातडीने खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने देण्यात आले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा