• Sat. Mar 14th, 2026

    Mumbai News: सदोष पॅरासिटामॉलचा पुरवठा; FDAने केलेल्या तपासणीअंती सार्वजनिक रुग्णालयांतून नमुने ताब्यात

    Mumbai News: सदोष पॅरासिटामॉलचा पुरवठा; FDAने केलेल्या तपासणीअंती सार्वजनिक रुग्णालयांतून नमुने ताब्यात

    Mumbai News: अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीमध्ये पॅरासिटामॉल गोळ्यांच्या सदोष बॅचमधील नमुने सात जुलै आणि २६ जून रोजी राज्यातील काही सार्वजनिक रुग्णालयांमधून ताब्यात घेण्यात आले आहेत.

    paracetamol(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    शर्मिला कलगुटकर, मुंबई : औषधांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे राज्याच्या सार्वजनिक रुग्णालयामध्ये निकृष्ट दर्जाच्या गोळ्या-औषधांचा पुरवठा झाल्याचे गैरप्रकार यापूर्वी घडले आहेत. रुग्णाच्या जिवाशी त्यामुळे खेळ झाला असल्याने त्यापासून धडा घेत दर्जाच्या निकषांवर चोख असलेल्या औषधांची उपलब्धता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र औषधांचा पुरवठा करताना त्याची पूर्तता होत नसल्याचे काही प्रकरणांमध्ये उघडकीस आले आहे.

    महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार कर्नाटक फार्मास्युटिकल लिमिटेड या पुरवठादार कंपनीने या गोळ्यांची उपलब्धता केल्याचे कळते. त्यातील बॅच क्रमांक आर २३००२ आणि आर २३००७ या दोन्ही बॅचेसमधील नमुने सदोष आढळले आहेत. रंग, औषधांमधील घटकद्रव्ये या संदर्भात प्रश्न होते. मार्चमध्ये वैद्यकीय विश्लेषण चाचणीसाठी या गोळ्यांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने घेतले होते. यातील उर्वरित रुग्णालयांना या गोळ्यांचा वापर थांबवण्याचे निर्देश चार महिने उलटल्यानंतरही अद्याप देण्यात आले नसल्याचे कळते.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय औषध प्राधिकरणाने या गोळ्यांची उपलब्धता ऑक्टोबर २०२३मध्ये निविदा न राबवता केली होती. प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सार्वजनिक रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा काहीवेळा निर्माण होतो. दोन वर्षांपूर्वी औषधांच्या संदर्भात अशीच स्थिती निर्माण झाली होती. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी दरकरार ( आरसी) प्रक्रियेने औषधांची उपलब्धता केली होती.
    Maharashtra TimesMumbai AC Local: एसी लोकलच्या बांधणीचा ‘श्रीगणेशा’; 21000 कोटींच्या लोकल खरेदीला राज्य सरकारची मंजुरी
    प्राधिकरणाकडे २१ वेगवेगळ्या औषधांच्या बॅचेसमधील औषधे ही गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता न करणारी निकृष्ट दर्जाची ठरल्याची माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता, दर्जा चाचणीचे सर्व निकष पूर्ण न करणाऱ्या आणि बोगस औषधांना विभिन्न निकष लागू होतात, असे त्यांनी सांगितले. बोगस औषधांची विशेष प्रयोगशाळेमध्ये चाचणी केल्यानंतर त्यांना पुढील मान्यता देण्यात येते. ही औषधे सदोष असतील तर त्याचा वापरही थांबवला जातो. या बॅच संदर्भात नेमके काय झाले याची माहिती घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

    मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलन करणं थांबवा, भुजबळांचं ओबीसी नेत्यांना आवाहन

    आरोग्यावर काय परिणाम ?
    महाराष्ट्र टाइम्सकडे असलेल्या माहितीनुसार प्राधिकरणाची स्वतंत्र अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही. त्यामुळे या औषधांची तपासणी नेमकी कुठे केली जाते, तिचे निकष काय असतात यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होता. औषधांचा दर्जा तपासण्यासाठी वेळोवेळी नमुना चाचणी करणे अत्यावश्यक आहे. तोहा प्रश्न सातत्याने उपस्थित झाला असला तरीही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. निविदा प्रक्रिया राबवून या औषधांची उपलब्धता झाली असती तर सरकारला या संदर्भात आर्थिक मोबदला घेता आला असता. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये ज्या गरजू गोरगरीब रुग्णांनी या औषधे घेतली त्यांच्या आरोग्यावर कोणते परिणाम झाले, याची माहितीही अद्याप मिळालेली नाही याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा