Jalgaon News : जळगावच्या रामेश्वर कॉलनीत एका १५ वर्षीय मुलीने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिची आई कामासाठी बाहेर गेली होती आणि भाऊ क्लासला गेला होता तेव्हा तिने हे पाऊल उचलले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. मंगळवार, २ सप्टेंबरला सायंकाळी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात आपले जीवन संपवले. जयश्री लक्ष्मण चव्हाण, वय१५, असे या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात आणि तिच्या कुटुंबीयांत शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास घड़ली. जयश्रीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती, तर तिचा लहान भाऊ शिकवणीला (क्लास) गेला होता. घरात ती एकटीच होती. याच एकांतक्षणी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. संध्याकाळी तिचे आजोबा घरी परतले असता, त्यांना जयश्रीने गळफास घेतल्याचे दिसले, हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी त्वरित तिला खाली उतरवले आणि तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
जयश्रीने हे पाउल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक किंवा मानसिक ताण आहे का? याचा पोलीस शोथ घेत आहेत. जयश्री आपल्या आई आणि भावासोबत राहत होती. तिच्या पश्चात आई, लहान भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

