• Sun. Mar 8th, 2026
    Pune News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर ‘या’ वाहनांना आता टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

    Free Tole : राज्य सरकारने टोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर वाहनांचा टोल हा घेतला जाणार नाही. नेमकी कोणती वाहने असणार आहेत? त्यांचा टोल का घेतला जाणार नाही? जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे : इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू येथून प्रवास करणाऱ्या ई-वाहनांना पूर्ण टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील ई-वाहनांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

    राज्य सरकारने ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१’ जाहीर करून, ई-वाहनांच्या वापराला चालना दिली. केंद्र सरकारने यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अंगीकार आणि उत्पादन (फेम) ही योजना सुरू केली होती. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा पुण्याने योग्य फायदा घेतला. त्यामुळे ई-वाहन खरेदीचा वेग वाढला. पुण्यात ई-वाहनांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली. पण, केंद्र सरकारने ई-वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ई-वाहन खरेदी मध्ये घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१नुसार काही महत्त्वाच्या मार्गावर टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : वनराज यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, बंडू आंदेकरांच्या टोळीचा बदल्याचा गेम फसला, पुणे पोलिसांची कारवाई
    राज्य सरकारने याबाबतचा आदेश नुकताच काढला आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृ‌द्धी महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या मार्गावर प्रवास करणाऱ्या ई-वाहनांना पथकर भरण्याची आवश्यकता राहणार नाही. ई-वाहन वापरामुळे इंधन खर्चात बचत होणार आहे; तसेच प्रदूषण नियंत्रणास मोठी मदत मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे ई-वाहन खरेदी करणाऱ्यांचा प्रवास खर्च आणखी कमी होईल. परिवहन विभागाकडून टोलमाफी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक समन्वय केला जाणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित महामार्ग प्राधिकरणांना सूचना देण्यात आल्या आहेत.
    Maharashtra Timesमराठा आंदोलकांनी घेराव घातला, गाडीवर बाटल्या फेकल्या, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

    पुण्यात ई-वाहने वाढली

    राज्यात साधारण सहा लाखांच्याजवळ ई-वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुण्यात ई-वाहनांची संख्या सव्वा लाखांवर गेली आहे. पुणे पिंपरी-चिंचवडमधून ई-कार, ई-बस मुंबईला मोठ्या प्रमाणात धावतात. व राज्यामध्ये पुण्यात ई-कार खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये खासगी व्यक्तींसोबत व्यावसायिक ई-कारचा वाढल्याचे दिसून येत आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा