• Mon. Mar 16th, 2026
    Solapur News: एकाच खोलीत 5 जण दाटीवाटीने राहायचे, रात्री खिचडी खाल्ली, सकाळी गॅस गळतीने सारं उद्ध्वस्त, तीन जणांचा मृत्यू

    Solapur Family Found Unconscious: ​सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी असलेल्या लष्कर परिसरातील लोधी गल्ली येथे ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाचजण रविवारी 1 ऑगस्ट रोजी राहत्या घरी संशयास्पदरित्या बेशुद्धावस्थेत आढळून आले आहेत. सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरा हर्ष बलरामवाले आणि अक्षरा बलरामवाले या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: सोलापूर शहरातील लष्कर परिसरात असलेल्या लोधी गल्लीत रविवारी (31 ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील पाचजण बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असताना पाच पैकी हर्ष बलरामवाले (वय 6 वर्ष) आणि अक्षरा बलरामवाले (वय 4 वर्ष) या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. एकूण पाच जणांवर उपचार सुरू असताना रविवारी दोन आणि सोमवारी दुपारी विमल मोहनसिंग बलरामवाले (वय 60 वर्ष) या वृद्ध महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. पण, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरातील घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाली त्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय 35 वर्ष, दोघे रा. बेडरपूल लष्कर, लोधी गल्ली, सोलापूर) ही विवाहित महिला अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत देत आहे. युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40 वर्षे, रा. बेडरपूल, लोधी गल्ली, लष्कर, सोलापूर) हे शुद्धीवर आहेत.
    Maharashtra TimesSolapur Crime : राहत्या घरात कुटुंबातील पाच जण बेशुद्ध, तोंडाला फेस; दोन चिमुकल्यांनी प्राण सोडले, सासू-सुनेची मृत्यूशी झुंज, काय घडलं?

    एकाच खोलीत पाच जणांचं कुटुंब दाटीवाटीने राहत होतं

    सोलापूर शहरातील नळबाजार चौकातील बालाजी मठाच्या जवळच बलरामवाले यांचे घर आहे. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी दुचाकीला जाण्याएवढी जागा, त्यांचे घर म्हणजे अंदाजे सात बाय दहाची खोली आहे. या एका खोलीत पाचजण दाटीवाटीने राहत होते. त्यात एका बाजूला गॅस शेगडी, दरवाजा उघडल्यानंतर समोरच टीव्ही दिसतो, त्याखाली पिण्याचे पाणी भरून ठेवलेली भांडी, घरातील इतर साहित्य हे एका बाजूला ठेवलेले आहेत.

    रक्तात कार्बन मोनॉक्साईड आढळले

    हर्ष बलरामवाले (वय 60 वर्ष), अक्षरा बलरामवाले (वय 4 वर्ष), विमल मोहनसिंग बलरामवाले (वय 60) या तिघांचा मृत्यू झाला आहे. रंजनाबाई युवराज बलरामवाले (35), युवराज मोहनसिंग बलरामवाले (40, सर्व रा. बेडरपूल, लष्कर) हे मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त आढळले. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
    Maharashtra TimesAC मध्ये कुटुंब निजलं, दोन चिमुरड्या भावंडांना झोपेतच मृत्यूने गाठलं, शेजारच्या खोलीचं गूढ काय?

    शनिवारी रात्री खिचडी करुन खाल्ली

    बलरामवाले कुटुंबाची परिस्थिती खूप हलाखीची आहे. कधी एक वेळचे जेवण मिळते, तर कधी मिळत नाही. शनिवारी (30 ऑगस्ट) रात्री त्यांनी एक किलो भात आणून खिचडी करून खाल्ली. त्यानंतर सगळे झोपी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. रविवारपासून शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची मोठी गर्दी परिसरात झाली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा