• Sat. Mar 7th, 2026
    Beed Crime : वाल्मिक कराडची सुटका नाहीच; संतोष देशमुख हत्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला, कारण काय?

    Beed Court Walmik Karad Bail Reject : दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.

    वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला मोठा झटका बसला आहे. ते म्हणजे, त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. कारण, बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या दरम्यान न्यायालयानं आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर बीडसह राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळाली. विधिमंडळातही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर, बीडमधील नेते आणि आमदार धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला.

    बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराड सह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी कारागृहात असून, वाल्मिक कराडने या हत्या प्रकरणातून मला दोष मुक्त करावं, अशी न्यायालयाकडे मागणी केली होती. यावर गेल्या दोन महिन्यापासून बीड न्यायालयात सुनावणी सुरू होती.
    मात्र, आज अखेर न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं चर्चेला उधान आलं आहे. तसेच विष्णू चाटेच्या अर्जाबाबत आद्याप काहीच निर्णय समोर आलेला नाहीय. मात्र, वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज अखेर न्यायालयानं आज फेटाळून लावला आहे. यामुळे वाल्मिक कराड याचे वकील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

    Maharashtra TimesMaratha Reservation : मोठी बातमी! कसं…पाटील म्हणतील तसं! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी

    धनंजय देशमुख काय म्हणाले?

    दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनजंय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधात पोलीस यंत्रणा लागली आहे. मात्र तो कुठे लपून बसला आहे, हे अद्याप समजलं नसल्यानं’ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्या लक्षात राहिला नसल्याचा’ आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘या प्रकरणाबाबत मी वेळोवेळी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. परंतु त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याचं उत्तर या यंत्रणेकडून येत आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा