Married Woman murder by Husband : शेतात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यामुळे चिडलेल्या पतीने धारदार शस्त्राने अंगावर सपासप वार करुन महिलेची हत्या केली.
याविषयी विस्तृत माहिती अशी की, विद्या विजय राठोड या महिलेचा काही वर्षांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघे येथील विजय राठोड यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर मात्र पती-पत्नीमध्ये भांडण होऊ लागली.
दररोज कौटुंबिक वाद होऊ लागले. दरम्यान या दाम्पत्यांना दोन मुलंही झाली. मुलांच्या जन्मानंतर तरी संसार सुरळीत होईल, असे विद्याला वाटत होते. पण नवरा बायकोचे भांडण काही संपण्याचे नाव घेत नव्हते. कंटाळून विद्या आपल्या माहेरी सोनापूर तांडा येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली. तिला वाटले नवरा आता तरी सुधारेल.
गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती. दुपारी दोनच्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये बोलणं होत असतानाच शाब्दिक चकमक उडाली आणि अचानक पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.
चिडलेल्या विजयने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढले आणि पत्नी विद्या हिच्या अंगावर सपासप वार सुरु केले. यात विद्या गंभीर जखमी झाली. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावतपळत आले. सर्वांनी मिळून विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केले.
Pune News : यकृतदान करुनही पतीचं निधन, विवाहितेचाही आठ दिवसात मृत्यू; पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचा महत्त्वपूर्ण रिपोर्ट दिला, आता..
तोपर्यंत विद्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात दाखल झाले. विद्याचा मृत्यू झाल्याचे कळताच भर पावसात नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. विद्याच्या नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली.
Nashik Crime : ए अक्षय, सांग मित्राला, आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत; एकतर्फी प्रेमातून बदनामी, नाशकात अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल
विद्याचा मृत्यू झाल्यानंतर मात्र आता तिची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत. आईच्या छत्रछायेशिवाय निरागस चिमुकल्यांचं भविष्य आता अंधारमय झालं आहे.
फडणवीसांना मराठ्यांचं मन जिंकण्याची संधी, मनोज जरांगेंच्या तीन मागण्या
रविवारी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस, गुरुवारी खून
पत्नी विद्या राठोड भांडण करून माहेरी गेल्यानंतर तिचा पती विजय राठोड याने रविवारी स्वतःच्या मोबाईलवर विद्या राठोड हिचा फोटो ठेवून त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर विजयने बुधवारी ‘भांडण झाल्यावर लोक त्यांचा व्हॉट्सअप डीपी हटवतात, मी लोकांनाच हटवतो’ असं स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

