• Sun. Mar 8th, 2026
    Manoj Jarange Patil : मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला केंद्रीय मंत्र्याचा पाठिंबा, पण….

    Ramdas Athawale Supports Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टला मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. यातली सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असनू एक सल्ला देखील दिला आहे.

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते. यंदा गणेशोत्सव असून मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. त्यात विघ्न येऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवागनी दिलेली नाही. तसेच मुंबई पोलिसांनी काल आंदोलनासाठी काही अटी ठेवल्या आहेत. याचदरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

    एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन रान तापलं असून, दुसरीकडे त्यांच्या आंदोलनावरुन ओबीसी (OBC) समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचा ठरावच आरपीआयच्या शिबिरात मंजूर केला आहे.

    Maharashtra Times‘सरकारवर आमची नजर, गरज पडल्यास मुंबई गाठू…’, ओबीसी नेत्याची मोठी घोषणा; फडणवीसांची कोंडी

    रामदास आठवले काय म्हणाले?

    आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. शिबिरात पक्षवाढीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरागेंच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला असल्याचं मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.

    Maharashtra TimesMaratha Reservation : तीन वर्षांपूर्वी मुलाचा अपघाती मृत्यू, आता बापाने मराठा आंदोलनात सोडला जीव; सतीश देशमुख कोण आहेत?

    आठवले म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको,’ अशी आमची भूमिका आहे. ‘मनोज जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घ्यावी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी’, असा सल्लाही जरांगे पाटील यांना आठवलेंकडून देण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा