Ramdas Athawale Supports Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टला मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. यातली सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असनू एक सल्ला देखील दिला आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन रान तापलं असून, दुसरीकडे त्यांच्या आंदोलनावरुन ओबीसी (OBC) समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचा ठरावच आरपीआयच्या शिबिरात मंजूर केला आहे.
‘सरकारवर आमची नजर, गरज पडल्यास मुंबई गाठू…’, ओबीसी नेत्याची मोठी घोषणा; फडणवीसांची कोंडी
रामदास आठवले काय म्हणाले?
आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. शिबिरात पक्षवाढीच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरागेंच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला असल्याचं मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.
Maratha Reservation : तीन वर्षांपूर्वी मुलाचा अपघाती मृत्यू, आता बापाने मराठा आंदोलनात सोडला जीव; सतीश देशमुख कोण आहेत?
आठवले म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको,’ अशी आमची भूमिका आहे. ‘मनोज जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घ्यावी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी’, असा सल्लाही जरांगे पाटील यांना आठवलेंकडून देण्यात आला आहे.

