Nagpur Lightning Strike Three Death : नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करताना मायलेकासह तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेनं नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत ज्या मायलेकांचा मृत्यू झालाय. त्यांना एक १४ वर्षीय मुलगी तथा बहीण होती. तिचं मातृछत्र हरपलं आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदना, ओम व निर्मला हे तिघे शेतात काम करीत होते. अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी तिघेही शेतातील एका झाडाखाली गेले. याचदरम्यान वीज कोसळली. होरपळून तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. शेजारील शेतात काम करणाऱ्या श्रमिकांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. एका ग्रामस्थाने सावनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी तिघांचेही मृतदेह सावनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेने धापेवाड्यात शोककळा पसरली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गावर ट्रकची ट्रकला जोरदार धडक, भीषण अपघातात चालकाचा दुर्दैवी अंत
गेल्यावर्षी झाले प्रकाश यांचे निधन
गेल्यावर्षी ओम याचे वडील प्रकाश यांना बैलाने लाथ मारली. त्यामुळे ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश यांच्या मृत्यूनंतर पाटील मायलेक दोन एकर शेती करून उदरनिर्वाह करायचे. वंदना व ओमच्या मृत्यूने ओमची बहीण संस्कृतीचे (वय १४) मातृछत्र हरवले आहे. आई व भावाच्या मृत्यूने ती जबर धक्क्यात आहे.
दरम्यान, काल शहरात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर मंगळवारी सकाळी घडलेली घटना परिसराला हादरवून गेली. नगरपरिषदेच्या डम्पिंग साइटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मूकबधिर मुलाचा विराट राणा पवार याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Manoj Jarange : बापाला पाहताच लेकींच्या डोळ्यात पाणी, बायकोकडून औक्षण, मुलाने घातल्या कवड्याच्या माळा
काटोल नगरपरिषदेने कचरा डम्पिंगसाठी मोठमोठे खड्डे खोदले होते. मात्र, त्यांची सुरक्षितता किंवा योग्य देखरेख केली नव्हती. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि परिसर धोकादायक बनला. याच खड्ड्यात पडून विराटचा जीव गेला. अपंगत्वामुळे आधीच संघर्षमय जीवन जगणाऱ्या या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाचे दुःख पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. आई माधुरी पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण समाजानेही या दुर्घटनेबद्दल तीव्र संपात व्यक्त केला आहे.

