• Sat. Mar 7th, 2026
    सामानाची बांधाबांध, धाराशिवमधून 12 हजार वाहने मुंबईकडे जाणार; मराठा बांधवांचा निर्धार!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील…मराठा बांधव जवळपास 12 हजार पेक्षा अधिक वाहने घेऊन मुंबईकडे जाणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास लाखो मराठा बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.मुंबई येथे खाण्याची अडचण येऊ नये म्हणून काही मराठा बांधवांनी ट्रॅक्टरमध्ये…पाणी, भाजीपाला, किराणा सामान, गॅस तसेच स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य बरोबर घेतलंय.ओबीसी मधलं आरक्षण हे आमचं हक्काचा असून आम्ही ते मिळवणारच…मनोज जरांगे पाटील यांच्यावर आमचा विश्वास असून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही असा विश्वास या तरुणांनी बोलून दाखवला. त्यांच्याशी सविस्तर बातचित केलीये आमचे प्रतिनिधी रहीम शेख यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed