या प्रकरणातील संशयित गणेश भांगरे, अक्षय वरठे आणि आतिशकुमार वैद्य यांनी युतीच्या कॉलेजमध्ये येऊन तिला बळजबरीने गणेश भांगरे याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्याकरिता देखील जबरदस्ती केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतलं आहे, तर एका फरार संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गोष्ट ‘राजा’च्या ‘किमती’ नैवेद्याची!
पोळ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सर्जा-राजा या लाडक्या बैलजोडीची पूजा करताना हरवलेली दीड लाखाची दीड तोळे सोन्याची अंगठी ‘राजा’ ने गिळल्याचे उघडकीस आले. बैल पोळ्याची ही घटना सर्वदूर चर्चेचा विषय ठरली.
बिचाऱ्या मुक्या जनावरांना काय सोने माहिती असणार? पण बैलजोडी मालकाने व अंगठी मालकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यांनी बैलांच्या विष्ठेकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अखेर तपासणीसाठी शनिवारी रात्री ज्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य प्रेमाने खाऊ घातला, त्यांना दिवसभर उपाशी ठेवण्याची वेळ आली. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शस्त्रक्रिया करून अंगठी काढावी लागल्याची घटना नांदगाव तालुक्यात घडली.
