• Thu. Mar 19th, 2026

    अल्पवयीन मुलीचा फेसबुकवरील फोटो व्हायरल, त्रासाला कंटाळून पिडितेनं आयुष्य संपवलं

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    अल्पवयीन मुलीचा फेसबुकवरील फोटो व्हायरल, त्रासाला कंटाळून पिडितेनं आयुष्य संपवलं
    नाशिक 
    नाशिक शहरात अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यानं अल्पवयीन मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तीन संशयित तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन मुलांनी अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करत युवतीच्या सोशल मीडिया अकाऊंटचा युजर आयडी व पासवर्ड टाकत अकाऊंट उघडून युवतीसोबत गळ्यात हात घातलेला फोटो आणि त्यात तिचा बॉयफ्रेंड असल्याचं लिहित व्हायरल केला. त्यामुळे कॉलेजमध्ये बदनामी झाल्याने युवतीने टोकाचं पाऊल उचललं. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट केल्यानंतर संशयीत गणेश भांगरे याने मुलीला फोन करत शिवीगाळ करत त्रास दिला. यामुळे नैराश्यातून पिडीत मुलीने १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूमच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    या प्रकरणातील संशयित गणेश भांगरे, अक्षय वरठे आणि आतिशकुमार वैद्य यांनी युतीच्या कॉलेजमध्ये येऊन तिला बळजबरीने गणेश भांगरे याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्याकरिता देखील जबरदस्ती केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतलं आहे, तर एका फरार संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    गोष्ट ‘राजा’च्या ‘किमती’ नैवेद्याची!

    पोळ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सर्जा-राजा या लाडक्या बैलजोडीची पूजा करताना हरवलेली दीड लाखाची दीड तोळे सोन्याची अंगठी ‘राजा’ ने गिळल्याचे उघडकीस आले. बैल पोळ्याची ही घटना सर्वदूर चर्चेचा विषय ठरली.

    बिचाऱ्या मुक्या जनावरांना काय सोने माहिती असणार? पण बैलजोडी मालकाने व अंगठी मालकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यांनी बैलांच्या विष्ठेकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अखेर तपासणीसाठी शनिवारी रात्री ज्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य प्रेमाने खाऊ घातला, त्यांना दिवसभर उपाशी ठेवण्याची वेळ आली. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शस्त्रक्रिया करून अंगठी काढावी लागल्याची घटना नांदगाव तालुक्यात घडली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed