रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील ऐतिहासिक पुलावरून अन्वर शेख यांचा पाय घसरून ते अंबा नदीत पडल्याची घटना घडली. २३ ऑगस्टला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते पाय घसरुन पडले होते. त्यांचा मृतदेह तब्बल पन्नास तासांनी सांबरी गावच्या पकटीजवळ आज सकाळी सापडला आहे. नागोठणे पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.नागोठणेच्या मोहल्ला येथील रहिवासी 55 वर्षीय वाहनचालक अन्वर अजीज पिंजरी हे 23 ऑगस्टला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक नागोठणे – वरवठणे पूलावरून जात होते. इतक्यात त्यांचा तोल गेला आणि ते अंबा नदीत पडले आणि वाहून गेले. यांचा मृतदेह सुमारे 50 तासांनंतर आढळून आला आहे. अंबा नदीच्या खाडीत सांबरी गावच्या पकटीजवळ मृतदेह दिसल्याची माहिती नागोठण्याच्या निसर्ग वन्यजीव संरक्षण संस्था रायगड यांच्या नागोठणे टीमला मिळाली होती. त्यानंतर या टीमने सांबरी पकटी येथे जाऊन अनवर यांचा मृतदेह छोट्या होडीत टाकून नागोठण्यात आणला होता. अन्वर यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.शनिवारी 23 ऑगस्टला नागोठण्यातील जुन्या पुलावरून पाय घसरून पडल्याने अनवर हे अंबा नदीच्या पात्रात वाहून गेले होते. सह्याद्री वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीम कडून शनिवारी संध्याकाळपर्यंत अन्वर शेख यांची शोधमोहीम राबविण्यात आली होती. मात्र, ते काही सापडले नव्हते. दरम्यान निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड यांच्या नागोठणे टीमकडून अन्वर शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या या टीम मध्ये एनव्हीआरएसएस संस्थेचे नागोठणे अध्यक्ष प्रथमेश कोळी, सदस्य प्रणाल शिर्के, वसंत डोलकर, नवनीत मोकल, साहिल राणे, सनिस मिणमिणे, रोहित पाटील, स्वागत पारंगे, विनय पारंगे, कल्पेश बडे, नीरज बडे, अखिल शेलार यांचा समावेश होता.