Beed News: बीड जिल्ह्यातील मांजरसूंबा येथील बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा दिला. मुंबईत आंदोलकांला त्रास झाल्यास भाजप आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा, भाषणातील 10 मोठे मुद्दे
– आता ही लढाई शेवटची, आता माघार नाही. मी मरण्यासाठी घाबरत नाही, आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही.
– 27 तारखेला आपल्या सर्वांना अंतरवाली येथून एकत्र निघायचे आहे आणि 29 तारखेला शांततेत मुंबईमध्ये जायचे आहे. अतिशय शांततेत आपलं आंदोलन करायचे आहे. कोणी जाळपोळ दगडफेक केली तरी एकानेही पळायचे नाही, कोणीही तिथून हलायचे नाही. ती आपली पैदैस नाही. आपल्याला खूश करण्यासाठी त्यांचेच लोक वेगवेगळ्या घोषणा देतील, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
मनोज जरांगे यांचा बीडमध्ये DYSP यांना मोठा इशारा, ‘आता फक्त बीडमध्ये डीजे वाजूदे मग सांगतो’
– ही शेवटची फाईट आहे, बीड जिल्ह्यातील एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. आता माघार नाही. सर्वांनी मिळून मुंबईकडे यायचे. आंदोलन करून माझा किस पडला आहे. सगळ्यांना सांगा की यावेळी मुंबईला चला. सत्तेतील लोकांचे ऐकूण तुम्ही घरी बसू नका. पक्षासाठी तुम्ही जात सोडू नका. मराठ्यांच्या लेकरांच्या शिव्या-शाप घेऊ नका.
– तुम्ही आणखी दोन-तीन वर्षे थांबा, आपली लेकरेच राज्य करतील, ते खूप हुशार आहेत, दिवस रात्र अभ्यास करतात, आपल्याला आरक्षण दिले नाही म्हणून आपण मागे राहिलो, पण आता असे होणार नाही.
– फडणवीस साहेब… मराठ्यांना त्रास देऊ नका, आम्ही एकदा आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं तर मराठा मग कोणाच्याच बापाला ऐकत नाही.
– मला जाळपोळ, दगडफेक मान्य नाही. मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो, मला समाजातील एकही लेकरू वाया जाऊ द्यायचं नाही.
– मी मरणापर्यंत येऊन टेकलोय, उपाशा-तापाशी राहतो, रक्त जाळतो पण एक इंचही मागे सरकत नाही. तुमच्या लेकरांसाठी लढतोय.
– देवेंद्र फडणवीसांनी जाती-जातीत भांडणं लावली, आपल्या अंगावर ओबीसींना पाठवलं, पण आपण भांडण होऊ दिलं नाही.
– ही लढाई आता अंतिम आहे. आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. अनेक लोक अशाच शेवटच्या टप्प्यात मागे सरकतात, पण आपण असं करायचं नाही. कोणी गाफील व्हायचे नाही. तुम्ही घरी बसू नका, माझी जात हरली नाही पाहिजे. समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. आता आपण विजयाच्या जवळ गेलो आहोत.
– मुंबईला येताना तुम्ही कोणावर अवलंबून राहू नका, पीठ-मीठ घेऊन या. पाऊस आहे तिथे, त्यामुळे छत्र्या घेऊन या. आपली व्यवस्था आपण करा.
