• Fri. Jul 3rd, 2026

    शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार; 21 किमीचा उड्डाणपूल, दीड तासाचं अंतर 25 मिनिटांत पार होणार

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार; 21 किमीचा उड्डाणपूल, दीड तासाचं अंतर 25 मिनिटांत पार होणार

    Shilphata – Kalyan Bridge : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नव्या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या उड्डाणपुलामुळे दीड तासाचं अंतर २५ मिनिटांत पार होणार असल्याचा दावा केला जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : महामुंबईतील सर्वाधिक वाहतूक कोंडीग्रस्त भाग म्हणून कुपरिचित असलेले शिळफाटा-कल्याण ते रांजनोली हे तब्बल २१ किलोमीटरचे अंतर प्रवाशांना उड्डाणपुलाद्वारे पार करता यावे, यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सध्या हजारो वाहनचालकांना तासन् तास या मार्गावर खोळंबून राहावे लागते. उड्डाणपुलामुळे हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करता येणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या मार्गामुळे भिवंडी परिसरातील गोदामांमधून होणारी मालवाहतूक अधिक जलद आणि सुलभ होऊ शकणार आहे. या उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुनरावलोकन तसेच, तो अंतिम करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.

    वाहतूक कोंडीवर उपाय, नव्या उड्डाणपुलामुळे फायदा होणार

    ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शिळफाटा, पलावा, डोंबिवली, कल्याण ही सर्वाधिक कोंडीची ठिकाणे आहेत. याच रस्त्यावरून काटईवरून अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर कोळेगाव, खोणी, नेवाळी आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर कोंडी होते.
    Maharashtra Timesकल्याण – शीळ रोड असुरक्षित; सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोऱ्या, अपघातांच्या तपासांत अडथळे, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे

    इंधन आणि वेळेची बचत होणार

    शिळफाटा, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर वाहने भिवंडी, रांजनोलीकडे प्रवास करतात. असाच प्रवास भिवंडी, रांजनोलीहून डोंबिवली, शिळफाटा, नवी मुंबईच्या दिशेला केला जातो. या प्रवासासाठी वाहतूककोंडी नसताना दीड तास, तर कोंडी असताना दोन ते अडीच तास लागतात. अवजड वाहने हा प्रवास मुंब्रामार्गे नाशिक महामार्गाने करतात. कारण सध्या तरी त्यांच्यासाठी थेट रस्ताच नाही. परिणामी, विविध शहरे ओलांडूनच त्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होतात.
    Maharashtra TimesMissing Link : 11 किमीचे दोन बोगदे, 132 फूट उंचीवर केबल-स्टेड पूल; मुंबई-पुणे अंतर कमी करणारा‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार?
    या पार्श्वभूमीवर या भागात थेट उड्डाणपूल असावा, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘एमएमआरडीए’कडे केली होती. त्यानंतर ‘एमएमआरडीए’ने यावर प्रक्रिया सुरू केली. आता त्यासाठी निविदा जाहीर केली असून या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पुनरावलोकन तसेच, तो अंतिम करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवल्या

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा