• Fri. Jul 3rd, 2026

    पिकाला खत देण्यासाठी गेला, पंप चालू केला आणि अनर्थ घडला

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    पिकाला खत देण्यासाठी गेला, पंप चालू केला आणि अनर्थ घडला

    Chhatrapati Sambhajinagar farmer Death : एका शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंपाचा शॉक लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत तरुण शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने कुटुंबार शोककळा पसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शेतातील पिकाला ठिबकाद्वारे खत सोडण्यासाठी शेतात गेलेल्या तरुणाला विद्युत पंपाचा शॉक लागून दुर्दैवी घटना घडली आहे. मुलाला शॉक लागल्याचं आईच्या लक्षात येताच आईने आरडाओरड केली, त्यानंतर शेजारी जमले. सर्वांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी शेतकरी तरुणाला तपासून मृत घोषित केलं. ही घटना कन्नड तालुक्यातील नाचनवेल शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडली. तरुण मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    संदीप चत्तरसिंग राजपूत, वय २८, राहणार नाचनवेल तालुका कन्नड, असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राजपूत कुटुंबाची नाचनवेल शिवारात गट क्रमांक 45 मध्ये शेती आहे. राजपूत यांनी शेतात आल्याचं पीक घेतलं आहे. दरम्यान शुक्रवारी पिकाला खत देण्याचा निर्णय राजपूत कुटुंबाने घेतला. यासाठी संदीप आणि त्याची आई शेतात गेले. पिकाला ठिबकाद्वारे खत सोडण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी संदीप गेला.
    Maharashtra Timesकंपनीचं काम करुन निघाला, वाटेत काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबाचा टाहो
    संदीपने विद्युत पंप चालू करताच त्याला विजेचा जोराचा धक्का लागला. ही बाब संदीपच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी संदीपला वाचवण्यासाठी आरडाओरड केला. यावेळी आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले. संदीपला तात्काळ नाचनवेल येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शेवगण यांनी संदीपलात तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला होता. संदीपच्या पश्चात आई, दोन मोठे भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

    Pasha Patel | कर्माची फळं भोगावी लागणार, शेतकऱ्यांवर संकट येणारच! पाशा पटेलांच्या वक्तव्यानं वाद

    लहानपणीच हरवलं वडिलांचे छत्र

    संदीप राजपूत याला दोन भाऊ आहेत. तीनही भावंड लहान असताना त्यांचे वडील चतरसिंग यांचा मृत्यू झाला. यामुळे तीनही मुलांचं वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. त्यानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली. आईने कष्टाने तीनही मुलांना सांभाळून मोठं केलं. संदीप हा त्यांचा लहान मुलगा होता. मात्र याच मुलाला विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलानंतर मुलाचा मृत्यू झाल्यामुळे देखील गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा