Chhatrapati Sambhajinagar farmer Death : एका शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंपाचा शॉक लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत तरुण शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने कुटुंबार शोककळा पसरली आहे.
संदीप चत्तरसिंग राजपूत, वय २८, राहणार नाचनवेल तालुका कन्नड, असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राजपूत कुटुंबाची नाचनवेल शिवारात गट क्रमांक 45 मध्ये शेती आहे. राजपूत यांनी शेतात आल्याचं पीक घेतलं आहे. दरम्यान शुक्रवारी पिकाला खत देण्याचा निर्णय राजपूत कुटुंबाने घेतला. यासाठी संदीप आणि त्याची आई शेतात गेले. पिकाला ठिबकाद्वारे खत सोडण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी संदीप गेला.
कंपनीचं काम करुन निघाला, वाटेत काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबाचा टाहो
संदीपने विद्युत पंप चालू करताच त्याला विजेचा जोराचा धक्का लागला. ही बाब संदीपच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी संदीपला वाचवण्यासाठी आरडाओरड केला. यावेळी आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले. संदीपला तात्काळ नाचनवेल येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शेवगण यांनी संदीपलात तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला होता. संदीपच्या पश्चात आई, दोन मोठे भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
Pasha Patel | कर्माची फळं भोगावी लागणार, शेतकऱ्यांवर संकट येणारच! पाशा पटेलांच्या वक्तव्यानं वाद
लहानपणीच हरवलं वडिलांचे छत्र
संदीप राजपूत याला दोन भाऊ आहेत. तीनही भावंड लहान असताना त्यांचे वडील चतरसिंग यांचा मृत्यू झाला. यामुळे तीनही मुलांचं वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. त्यानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली. आईने कष्टाने तीनही मुलांना सांभाळून मोठं केलं. संदीप हा त्यांचा लहान मुलगा होता. मात्र याच मुलाला विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलानंतर मुलाचा मृत्यू झाल्यामुळे देखील गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

