Devendra Fadnavis On Rahul Gandhi: व्होटचोरी म्हणणारेच मोठे चोर आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राहुल गांधी पुन्हा लक्ष्य करण्यात आले.
भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठवलेल्या हजारो राख्या सुपूर्द करण्याचा सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र डागले.
Uddhav Thackeray: ‘गरम सिंदूर’चे कोल्डड्रिंक झाले का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींना प्रश्न, पाकसोबत क्रिकेटवरुन टीका
‘महिलांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत, पण महिलांसाठी सुरू केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘राज्यभरातील बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहिणींच्या ऋणातच राहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही. त्या निरपेक्ष प्रेमाच्या प्रतिक आहेत.
चाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक
इतक्या बहिणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे, अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही’, अशा सांगत त्यांनी लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या सन्मानपूर्वक स्वीकारल्या. ‘महिला सक्षम झाल्या तर परिवार आणि समाज सक्षम होतो’, असे नमूद करतानाच विविध माध्यमांतून महिलांना दिलेले कर्ज १०० टक्के वसूल झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

