• Wed. Jun 17th, 2026

    व्होटचोरी म्हणणारेच मोठे चोर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राहुल गांधी पुन्हा लक्ष्य

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    व्होटचोरी म्हणणारेच मोठे चोर; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राहुल गांधी पुन्हा लक्ष्य

    Devendra Fadnavis On Rahul Gandhi: व्होटचोरी म्हणणारेच मोठे चोर आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राहुल गांधी पुन्हा लक्ष्य करण्यात आले.

    cm fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींच्या मताला व्होटचोरी म्हणणारेच सर्वांत मोठे चोर आहेत. व्होटचोरी म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे, बुद्धी चोरीला गेली आहे. माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की, अशा निर्बुद्धांना अक्कल यावी म्हणून त्यांना २५ टक्के आशीर्वाद द्यावेत. विदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. दरम्यार्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एक लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

    भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठवलेल्या हजारो राख्या सुपूर्द करण्याचा सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र डागले.
    Maharashtra TimesUddhav Thackeray: ‘गरम सिंदूर’चे कोल्डड्रिंक झाले का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींना प्रश्न, पाकसोबत क्रिकेटवरुन टीका
    ‘महिलांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत, पण महिलांसाठी सुरू केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘राज्यभरातील बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहिणींच्या ऋणातच राहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही. त्या निरपेक्ष प्रेमाच्या प्रतिक आहेत.
    Maharashtra Timesचाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक
    इतक्या बहिणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे, अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही’, अशा सांगत त्यांनी लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या सन्मानपूर्वक स्वीकारल्या. ‘महिला सक्षम झाल्या तर परिवार आणि समाज सक्षम होतो’, असे नमूद करतानाच विविध माध्यमांतून महिलांना दिलेले कर्ज १०० टक्के वसूल झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा