• Tue. Jun 16th, 2026

    ‘गरम सिंदूर’चे कोल्डड्रिंक झाले का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींना प्रश्न, पाकसोबत क्रिकेटवरुन टीका

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    ‘गरम सिंदूर’चे कोल्डड्रिंक झाले का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींना प्रश्न, पाकसोबत क्रिकेटवरुन टीका

    Uddhav Thackeray: राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचे ढोंग उघडे पाडताना त्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे. अशा लोकांच्या हातून देशाला वाचवायचे आहे’, असे आवाहनही त्यांनी यावेळी ठाकरेंनी केले.

    uddhav thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : पहलगामध्ये आपले नागरिक मारले गेले, सैनिक हुतात्मा झाले, आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. पण तरीही तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार आहात. ‘ ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘मेरे रग रग मे खून नही गरम सिंदूर बहे रहा है…’ मग त्या गरम सिंदूरचे काय कोल्ड्रिंक झाले काय?, असा प्रश्न शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उपस्थित केला.

    महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विधान परिषद सदस्यत्व वर्षपूर्तीनिमित्त कार्य पुस्तिकेचे उद्धव यांच्या हस्ते दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.

    उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर गणपतीचं निमंत्रण? आशिष शेलारांच्या भेटीवर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

    ‘देशातील सध्याचे वातावरण पाकिस्तान व चीनचा निषेध करायचा की नाही, याबाबत साशंकता निर्माण करणारे आहे. संघराज्य अफगाणिस्तानमध्ये घुसल्यावर अमेरिकेसह काही देशांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. भारत मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे. एकिकडे ऑपरेशन सिंदूर राबवायचे, दुसरीकडे सामने खेळायचे हा प्रकार निषेधार्थ आहे. सत्ताधारी न शिकल्याचा हा परिणाम आहे. शाळेत न गेल्यामुळे चांगले शिक्षक मिळाले नाहीत. परिणामी देशभक्ती त्यांना कळाली नाही’, असा टोला उद्धव यांनी लगावला. ‘यांनी बांगलादेशच्या शेख हसीनाला आसरा दिला. भ्रष्टाचाऱ्यांनाही आसरा देत असल्यामुळे या सर्वांची कीव येते’, असेही ते म्हणाले.निवडणूक आयोग लक्ष्य
    निवडणुकीच्या काळात शिक्षकांना कामे देण्यावरून उद्धव यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. ‘शिक्षकांनी मतचोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हजेरीपट घेऊन बसायची तुम्हाला सवय असल्याने दुबार मतदान करणाऱ्यांना जाब विचारा’, असे आवाहन त्यांनी केले.
    Maharashtra Timesगणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महामार्गांवर टोलमाफी, दर्शन पासचीही सुविधा
    तेव्हा भूतदया कुठे गेली होती
    मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरांच्या खाद्यबंदीच्या मुद्द्यांवरही उद्धव यांनी यावेळी भाष्य केले. ‘कबुतरे, भटके कुत्रे आणि हत्तिणीसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. चांगली गोष्ट आहे. माणुसकी, भूतदया पाहिजे; पण जेव्हा पहलगामध्ये आपले नागरिक मारले गेले, सैनिक हुतात्मा झाले, आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, तेव्हा माणुसकी आणि भूतदया कुठे गेली होती’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

    उद्धव म्हणाले…
    पहलगामध्ये सैनिक हुतात्मा झाले, माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले
    तरीही तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार आहात
    राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचे ढोंग उघडे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा