Ahilyanagar Newasa Farmer Suicide Video : अहिल्यानगरमधील नेवासा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून आपली कैफियत सरकारसमोर मांडली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. घरता कर्ता पुरुष गेल्यानं देखील कुटुंबाने टाहो फोडला.
सुभाष सरोदे व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, ‘मी अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर, भरवशावर मी जिवंत होतो. आज-उद्या कर्जमुक्ती होईल या आशेनं मी जिवंत होतो. मात्र सध्याच्या सरकारकडून माझी आशा संपली आहे. जिवंतपणी मला मदत नाही झाली, आता मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि कोणी कर्जबाजारी शेतकरी बांधव असतील तर त्यांनी मदत करा’, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान, त्यांचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक्स (ट्वीट) केला आहे.
मराठी तरुण उद्योजकाची अकाली एक्झिट; ‘केक वर्ल्ड’चे रोहन म्हात्रे यांचे निधन, अनेक स्वप्नं अधुरी
सरोदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी करून ठेवलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, ‘मी अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर, भरवशावर मी जिवंत होतो. आज-उद्या कर्जमुक्ती होईल या आशेवर मी जिवंत होतो. भाजप सरकार दोनदा सत्तेत आले. फडणवीस साहेब हे दोनदा मुख्यमंत्री झाले. पण, बोलल्याप्रमाणे त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नाही. माझी आज आशा संपलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक पिळले, धनवंताने अधिक छळले, क्रुर झाले साव… तसं हे सरकार झालेले आहे’, असंही त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.
देशभरातील श्वानप्रेमींसाठी आनंदाची बातमी, सुप्रीम कोर्टाकडून निकालात सुधारणा, भटक्या कुत्र्यांना सोडणार, पण…
‘अर्थव्यवस्था आमच्यासाठी नाही, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही, तर उद्योगपतींसाठी आहे. या सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही, म्हणून मला आत्महत्या करायची वेळ आली आहे. योग्य वेळी मला सरकारकरडून मदत झाली असती तर नक्कीच मी माझे आयुष्य जगलो असतो. पण, आता माझा आत्मविश्वास संपला आहे. कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. फडणवीस साहेब, आपले अस्तित्व सिध्द करायचे असेल तर जिवंत माणसाला तर मरावे लागत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. या जिवंत जगात जगायचे असेल तर पैशाशिवाय दुसरे काहीही लागत नाही. जिवंतपणी मला मदत नाही झाली, आता मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि कोणी कर्जबाजारी शेतकरी बांधव असतील तर त्यांना मदत करा’, अशी आर्त हाक सुभाष सरोदे यांनी घातली आहे.

