Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये तर एका सहा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. एकुलता एक रिशान गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबियांचा आक्रोश बघून उपस्थितांचे पण डोळे पाणावले आहेत.
दुसरी घटना भंडारा शहराजवळील खमारी (बुटी) येथे घडली. वैनगंगा नदीत बुडून निलेश रामू मारवाडे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. निलेश हे २० ऑगस्ट रोजी सकाळी घरून निघाले होते. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कारधा पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता वैनगंगा नदीच्या झिरी घाटावर त्यांचा मृतदेह आढळला. कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा
पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी पिढी नदीवर गेलेला युवक पुरात वाहून गेला. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खोळद येथे आज शुक्रवारी सकाळी घडली. शंतनू अविनाश मानकर (वय २५) असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे.
शवविच्छेदनासाठी खाटेवरून नेला मृतदेह
पोळ्यासाठी शाळेतून सुटी घेऊन आलेला सहा वर्षीय बालक गावाजवळील नाल्यात वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनासाठी मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचा होता. गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने अडचण निर्माण झाली. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नेण्यात आला. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयर येथे आज समोर आली.
Chhatrapati Sambhajinagar Crime : मोकळ्या प्लॉटवर ढोल ठेवण्यास नकार, कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू; संभाजीनगर हादरलं
रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६ वर्ष, रा. कोयर, भामरागड) असं मृत बालकाचं नाव आहे. रिशान हा गावापासून १० किमी अंतरावरील लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. पोळ्याचा सण असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणले. रिशान काल गुरुवारी दुपारी गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता. खेळत असताना नाल्यात गेला असता वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेत त्याचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनासाठी भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचे होते. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नारगोंडापर्यंत आणून नंतर भामरागड तालुका मुख्यालयात नेण्यात आले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात अजूनही रस्त्याची सोय नसल्यावरून संताप व्यक्त होत आहे.

