Palghar Gas Leak Four Workers Die : पालघरमधील तारापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मेडली फार्मासिटिकल्स या कंपनीत वायूगळती झाल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. वायूगळती झाल्यामुळे सहा जणांचा श्वास गुदमरला, उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एक १३ स्थित मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड औषध तयार करणारी कंपनी आहे. कंपनीत एलबेंडेझोलचे उत्पादन सुरू असताना प्रक्रियेदरम्यान अचानक टँकमधून नायट्रोजन वायूची गळती झाली. आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. वायुगळती झाल्यामुळे कंपनीत असलेल्या कामगारांना वायुगळतीची बाधा झाली आणि त्यांचा श्वास गुदमरला.
ट्रम्प खोटं बोलले! मोदींचं नाव घेऊन केलेला ‘तो’ दावा चुकीचा; अमेरिकन दुतावासानं तोंडावर पाडलं
सहा कामगारांना वायुगळतीची बाधा झाल्याने तातडीने उपचारासाठी बोईसर येथील शिंदे रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सहापैकी चार कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापति आणि कमलेश यादव अशी मृत कामगारांची नावे आहेत. रोहन शिंदे व निलेश हाडळ या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वसई- विरार अंधारात बुडाले!
मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात मंगळवारी पूरस्थिती उद्भवली होती. यामुळे विजेचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आणि डिस्ट्रिब्युशन बॉक्स भागांत पाणी साचल्याने खबरदारी म्हणून महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. वसई आणि नायगावमधील वीज यामुळे दिवसभर गायब होती. येथील दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे.
Ajit Pawar : गर्दीतून ‘दादा, I LOVE U’ आवाज, अजित दादा म्हणाले ‘I LOVE U TOO’, पण कोणाला? VIDEO
वसई, विरार शहरांत पूरस्थिती निर्माण झाल्याने वीज खंडित होण्याच्या प्रकाराला नागरिकांना सामोरे जावे लागले. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी वाडा आणि गावराईपाडा येथील स्विचिंग खबरदारी महावितरणतर्फे म्हणून बंद करण्यात आले होते. अनेक ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागांत, विद्युत खांब असलेल्या भागात पाणी साचल्याने ११० ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आले होते. तसेच काही मिनी पिलर, डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस बंद ठेवले होते.

