• Tue. Jun 16th, 2026

    Chhagan Bhujbal: नाशिकचं पालकमंत्रिपद आम्हाला मिळायला हवे, कारण…; मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले

    Chhagan Bhujbal: नाशिकचं पालकमंत्रिपद आम्हाला मिळायला हवे, कारण…; मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले

    Chhagan Bhujbal On Guardian Minister Post: नाशिकचे पालकमंत्रिपद आमच्या पक्षाला मिळावे, असे छगन भुजबळ म्हणाले? या पदासाठी पक्ष कसा योग्य आहे याचं कारण त्यांनी सांगितलं.

    bhujbal new(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: रायगडमध्ये आमची एक सीट असताना आम्ही पालकमंत्रिपदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आम्ही आग्रह धरला पाहिजे, तसे मी अजित पवार व सुनील तटकरे यांना सांगणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्याला पालकमंत्रिपद नाही मिळाले तर ठीक, नाही तर मी इच्छुक नसल्याचेही भुजबळ म्हणाले.

    भुजबळ म्हणाले, की पालकमंत्री कुणालाही होऊ द्या; पण मला असे वाटते, की जसे रायगडमध्ये आमची एकच जागा आहे, तिथे आम्ही पालकमंत्रिपदाचा आग्रह धरतो. मी आमच्या लोकांना सांगेन, सर्वांत जास्त सात आमदार नाशिकमध्ये आहेत. त्यासाठीही तेवढाच आग्रह धरावा. पालकमंत्री कोण होणार, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. सात आमदार एकाच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्रिपद मिळायला पाहिजे, असे मला वाटते. माझे म्हणणे मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे मांडेन, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

    ‘तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा’- गिरीश महाजन
    पालकमंत्रिपदावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो सर्वांना बंधनकारक असेल. पालकमंत्रिपदासाठी आपण कोणत्याही प्रकारे आंदोलन केले नाही, की पोस्टर जाळलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी रायगडातील वादावरून लगावला.‘आयटी हब’साठी पायाभूत सुविधा
    आयटी हब नसल्याने जळगाव जिल्ह्यातील युवकांना पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे ‘आयटी हब’ निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यासह जळगाव शहरात पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जळगावात बोलताना दिली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर ‘समृद्ध खान्देश संकल्प’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरात उद्योजकांना येणे-जाणे सुरळीत व्हावे यासाठी विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू होणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा