Nagpur News: नागपूर जिल्ह्याचे योगदान ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणानंतर ते बोलले. विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि महानगरपालिकेतही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी चवरे-खोडे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
Nagpur News : हिंगणा वनपरिक्षेत्रात वनविभागाची मोठी कारवाई, सागवानाच्या लाकडाने भरलेला ट्रक जप्त
‘नवीन’ला मिळणार गती
नव्या नागपूरचा संकल्प सर्वांनी मिळून केला आहे. अत्यंत विकसित नवीन नागपूर होणार आहे. लवकरच त्याला कॅबिनेटची मंजुरी देण्यात येणार आहे. विकासात माध्यमांचीही महत्त्वाची भूमिका आहे, असे पालकमंत्री म्हणाले. नागपूर शहर सीसीटीव्हीखाली आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत आहे. ग्रामीण पोलिस विभागाने सावनेर शहरात पहिली एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा सुरू केली, याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांचे त्यांनी जाहीर कौतुक केले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचेही त्यांनी कौतुक केले.
निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी दोन कोटींची ऑफर होती, पण… ; अमर काळेंनी सगळं सांगितलं
येथेही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह
नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ध्वजारोहण केले, तर उच्च न्यायालयात न्या. अनिल किलोर यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. दीक्षाभूमी येथे समता सैनिक दलाने ध्वजारोहण करून मताधिकार जपण्याची शपथ दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह रेशीमबाग स्मृती मंदिरातही ध्वजवंदन झाले आणि पथसंचलन काढण्यात आले. महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ध्वजारोहण करून शहराच्या जागतिक स्तरावरील विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
