Supriya Sule on Sharad Pawar Statement : विधानसभा निवडणूक २०२४ आधी आपल्याला दोन व्यक्ती भेटले होते, त्यांनी 160 जागा जिंकून देण्याबाबतची गॅरंटी दिल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही. मागील सहा दशकांचा प्रवास पहा आजवर कोणावर आरोप केले नाहीत. ते काय म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे. राहुल गांधींची त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. आणि म्हणाले यात आपल्याला पडायचं नाही. याच्यावर आमचा विश्वास नाही. असं म्हणून साहेबांनी विषय सोडून दिला. त्यामुळे हा आरोप नाही. ते एक ‘स्टेटमेंट’ आहे. हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा हा डेटा आहे. हा डेटा निवडणूक आयोगही नाकारू शकत नाही. त्यात जी जी डुबलीकेट नावे त्या पुस्तकात आहेत. ती कागदपत्रे राहुल गांधींनी देशासमोर आणली आहे. याचे वेरिफिकेशन न्यूज चॅनेलने प्रत्यक्ष जाऊन केले आहे. हे वास्तव राहुल गांधींनी समोर आणले आहे. मुकेश अंबानी म्हणतात तेलापेक्षा डेटा जास्त महत्त्वाचा आहे. डेटा “इज” “द न्यू” ऑइल हे मुकेश अंबानींनीच देशाला शिकवलं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांचा इंडिया आघाडीला घरचा आहेर; म्हणाल्या, सध्या राजकारणाची नाही तर…
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं असेल तर एकाच घरात चुकीची पत्ते, आधार कार्ड हे तर चैनलने वास्तव दाखवले आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

