Mumbai Woman Brain Dead :बोरीवलीत राहणाऱ्या रिद्धी पारेख यांना डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या आई विशाखा पारेख ब्रेन डेड झाल्या आहेत
रिद्धी पारेख यांच्या आई विशाखा पारेख यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ झाली होती. उपचारादरम्यान त्यांना स्ट्रोक आला आणि त्या ब्रेन डेड झाल्या होत्या.
काय झालं नेमकं?
रविवार दुपारच्या सुमारास बोरीवलीत राहणाऱ्या रिद्धी पारेख यांना स्थानिक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या आई विशाखा पारेख ब्रेन डेड झाल्या आहेत. रिद्धी म्हणाल्या, “माझ्या आईला शुक्रवारी मध्यरात्री पायांमध्ये खूप दुखत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ असल्याचे निदान करत उपचार सुरु केले. पण दुसऱ्याच दिवशी तिला स्ट्रोक आला.”
रिद्धी यांनी दोन वर्षांपूर्वी अवयवदान करण्याची शपथ घेतली होती. आई विशाखा यांना हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. आईच्या इच्छेची आठवण होताच पारेख कुटुंबाने हा निर्णय घेतला. विशाखा यांचे हृदय, किडनी आणि लिव्हर दान करण्यात आले.
रिद्धी म्हणाली, “माझी आई नेहमीच सगळ्यांना मदत करायची. त्यामुळे मला खात्री होती की, तिलाही तिचे अवयव दान करायला आवडले असते.” तिने बहीण आणि वडील यांच्याशी बोलून याबद्दल निर्णय घेतला. पण एक अडचण होती, ती म्हणजे संबंधित हॉस्पिटल अवयवदानासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागात नोंदणीकृत नव्हते.
BEST Bus Accident : आधी बाबा गेले, आता आईही… योगा क्लासहून परतताना बसने चिरडलं, अपघातस्थळी पडलेली ती वस्तू पाहून हळहळ
रिद्धीने तिची चुलत बहीण प्रीती गांधी यांना फोन केला. प्रीती गांधी मोहन फाऊण्डेशन नावाच्या एका एनजीओमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात. ही एनजीओ मृत्यूनंतर अवयवदान करण्याबद्दल जागरुकता निर्माण करते.
मुंबई-गोवा महामार्गाची शिवेंद्रराजे भोसलेंकडून पाहणी, काय-काय अडचणी; खड्डेदुरुस्ती कधी?
मोहन फाउंडेशनच्या जया जयराम म्हणाल्या, “आम्ही विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राशी संपर्क साधला. हे केंद्र नोंदणीकृत हॉस्पिटल्समध्ये दान केलेले अवयव कोणाला द्यायचे हे ठरवते. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले की, पेशंटला कुठे हलवावे.” टीमने विशाखा पारेख यांना जुहूतील नानावटी हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय घेतला. रविवारची रात्र झाली तोपर्यंत त्यांना तिथे हलवण्यात आलं आणि अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
Nagpur Accident : मुलीला परीक्षेसाठी सोडायला आले, बापावर काळाचा घाला, कंटेनरखाली चिरडल्याने हृदयद्रावक मृत्यू
रिद्धी पारेख म्हणाली, “माझ्या मनात दु:ख आणि आनंद अशा दोन्ही भावना होत्या. दु:ख या गोष्टीचे होते की, माझी आई आता या जगात नाही, पण आनंद या गोष्टीचा होता की, माझ्या आईने तीन लोकांचे प्राण वाचवले.”

