छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगत ते म्हणाले की, शिवरायांनी निर्माण केलेली शिवशाही आजही जगाला मार्गदर्शक आहे; कोणत्याही सरकारने शिवशाहीच्या विचारांवर चाललं, तरच ते आदर्श राज्य ठरेल.तर मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याच्या मुद्द्यावर ‘लबाडाच्या घरचं जेवण’ अशी टीका करत सरकारला खोचक टोला लगावलाय.