Sanjay Raut on Devendra Fadnavis : कल्याण महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनी मासविक्री करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊतांनी तर थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य, हे काय धोतांड आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात काही झालं की सांगतात काँग्रेसच्या काळात, तुमच्या स्वप्नातसुद्धा काँग्रेस आणि आम्ही बसलेलो आहोत. नेहरूंच्या काळात, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक, नामर्द बनवत आहात का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला गेले की ते काय वरण भात तुप खाऊन लढत होते का? मांसाहार करत होते. पेशवेसुद्धा मासांहार करत होते, बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते, त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवर सैन्यालाही मांसाहार करावाच लागतो. वरण भात श्रीखंड पुरी खाऊन युद्ध नाही लढता येत, महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात. हे फतवे मागे घ्या, मराठी माणसाची संस्कृती खतम करताय. स्वातंत्र्यदिनी मांसाहार नाही, तुम्ही नका खाऊ, लपून तुम्ही खाताय ना मग लोकांवर का लादत आहात. हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? याविरोधात एकत्र येऊन सर्वांना आवाज उठवावा लागेल, अस संजय राऊत म्हणाले.
Ajit Pawar On Meat Sale Ban : मांस विक्री बंदीमुळे वातावरण तापलं, अजित पवारांचंही मोठं विधान; अयोग्य म्हणत सरकारसमोरील पेच वाढवला
शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ लोटला? मनोहर जोशींआधी शरद पवार मुख्यमंत्री होते त्याला किती काळ झाला आहे. शरद पवारांच्या काळात अध्यादेश निघाला आहे की नाही माहिती नाही. जे सरकार कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातील काही लोकांनी रेड्याचं मांस प्रसाद म्हणून खाललं आहे. मी हे जबाबदारीने सांगत आहे, ६५ रेडे कापले गेले त्याचा प्रसाद खावा लागतो. तिथं प्रथा आहे की प्राणी कापले की प्रसाद मांसाहार करावा लागतो. अशा सरकारचे जनक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रा सांगतायेत स्वातंत्र्यदिनी शाकाहारी व्हा, हे धोतांड बंद करा, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

