राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लागला आहे. गेल्या आठवड्यात 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नंतर आता 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी आणि पदे
डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:2009) यांची नियुक्ती आता मुंबईतील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून झाली आहे.
डॉ. संजय कोलते (IAS:SCS:2010) हे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली झाली असून ते आता मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.
सुशील खोडवेकर (IAS:RR:2011) हे मुंबईतील उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव होते. आता त्यांची नियुक्ती मुंबईत असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून झाली आहे.
सावन कुमार (IAS:RR:2019)हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांची बदली झाली असून ते आता भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील.
नमन गोयल (IAS:RR:2022) हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील ITDP चे प्रकल्प अधिकारी आणि अटापल्ली उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी होते. आता त्यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.
डॉ. जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) हे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
लघिमा तिवारी (IAS:RR:2023) ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या. त्यांची बदली आता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
गेल्या आठवड्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात तुकाराम मुंडे, आशा अफजल खान पठाण, अभय महाजन, ओंकार पवार आणि नितीन पाटील यांचा समावेश होता.

