• Sun. Jun 14th, 2026
    गुहागर हादरलं! पेढे खाल्ल्याने 11 महिलांना विषबाधा; खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

    Ratnagiri News: रत्नागिरीत पेढे खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    ratnagiri food poision case (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथे पेढे खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या महिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी यांच्याकडे काही महिला दागिन्यांशी संबंधित काम करतात. श्रावणी सोमवारनिमित्त एका महिलेने सकाळी अय्यंगार बेकरी येथून पेढे आणले इतरांना दिले.

    रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना तर नाशिकचं दादा भुसेंना मिळावं…उदय सामंत स्पष्टच बोलले

    मात्र काही वेळाने महिलांना चक्कर व उलटी होण्यास सुरुवात झाली. त्यांना तात्काळ शृंगारतळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वप्नाली पवार (२७), प्रतीक्षा मोहिते (२८), पूजा मोहिते (२३), वृषाली पवार (२६), विदिशा कदम (२३), सोनाली नाईक (२१), मधुरा घाणेकर (२३), निकिता गमरे (२५), प्रिया मोहिते (४०), संजना गिरी (३०) व मानसी शिगवण (२८) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वजणी तळवली, मळण, पालपेणे परिसरातील आहेत.
    Ratnagiri Crime : जोशीबाईंकडे दागिने असणार, जयेश-गणेशने प्लॅन आखला, शिक्षिकेच्या मर्डर केसचा धागा सोडवला लहानश्या…
    आरोग्य विभागाच्या गुहागर तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वाडकर यांनी त्वरित या महिलांची भेट घेतली. गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत व पथकाने पंचनामा केला आहे. ‘शृंगारतळीमधील बेकऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. अन्न व प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवत जिल्ह्यातील सर्व बेकऱ्यांची तपासणी करावी,’ अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.ऐन श्रावणी सोमवारच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता शृंगारतळी येथील बेकरीतून आणलेल्या या पेढ्यांमुळे झालेल्या विषबाधा प्रकरणानंतर आता मिठाई पेढे घेताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. मात्र अशा स्वरूपाच्या बेजबाबदारपणे वागणाऱ्या बेकरी अथवा मिठाईच्या दुकानांच्या किचनची तपासणी करून चौकशी करून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा