स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात आमदार रमेश कराड यांची जीभ घसरली. लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखे…असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केलं आहे.या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी…मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली. जनतेत संतापाची लाट उसळली असून…आपल्या मतदारसंघाची तुलना पाकिस्तानशी केल्याने काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला.