• Sat. Mar 7th, 2026
    Sanjay Raut : ‘देवेंद्र फडणवीसांनी गप्प राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे चोरीचा माल’, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

    Sanjay Raut on Election Commission : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. मतचोरीचा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्याबाबतही त्यांनी सवाल केला आहे.

    संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगजीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अचानक अदृश्य झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला घोटाळा, मतचोरी आणि निवडणूक आयोग असे महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या हाती लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजप, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मतचोरीचा मुद्दा चांगलाच लावून धरला.

    तर दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट संजय राऊत यांनी आता यासंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता या पात्रातून व्यक्त करण्यात आली आहे. सोबतच जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी ही या पत्रातून केली आहे.

    Pune Crime : रक्षाबंधनाला येताना भावाने… पुण्यातील विवाहिता स्नेहा झंडगेने स्वत:ला संपवलं, धक्कादायक खुलासे समोर

    पोलिस आम्हाला अडवू शकत नाही

    संजय राऊत म्हणाले की, ‘निवडणूक आयोग सरकारचं हस्तक म्हणून काम करतंय. आम्ही दिल्लीत त्यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहोत. पोलीस आम्हाला अडवू शकत नाही. सर्व खासदार एकत्र येऊन आम्ही देशाचं लक्ष वेधून घेणार आहोत. निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबतोय. निवडणूक आयोगाला आम्ही जाब विचारणार आणि तुरुंगात जाण्याचीही आमची तयारी आहे. निवडणूक आयोग दुतोंडी गांडूळ आहे. आमचा आयोगावर विश्वास नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    ‘शिवसेना नाव आणि चिन्ह चोरुन आयोगानं दुसऱ्या चोराच्या हातात दिलं हे आम्हाला चांगलं माहितीय. निवडणूक आयोगाने अमोल कीर्तिकरांची जागा चोरली. फडणवीसांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्विकारलंय का? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले लाभार्थी आहेत. फडणवीसांनी गप्प राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे चोरीचा माल आहे’.

    Thane Mahapalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती! गट-क व गट-ड च्या १७७३ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

    ‘नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात सव्वातीन ते साडेतीन लाखांच्या मतांची चोरी झाली आहे. त्यांच्या सख्ख्या भाच्याचं नाव कापलं गेलं, त्यांच्या घरातील लोकांची नावं कापली गेली. गडकरींना देखील कुणाला तरी पाडायचं होतं, त्यांना देखील कुणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं,’ असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. त्यांच्या मतदारसंघात इतके मतं वगळली असतील, तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं याचा विचार न केलेला बरा,’ असं संजय राऊत म्हणाले.

    महाराष्ट्र डेस्क

    लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.… आणखी वाचा