• Wed. Mar 11th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar: स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयार आहोत; शिवसेनेच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार

    Chhatrapati Sambhajinagar Politics: स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा शिवसेनेच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला.

    shivsena meeting (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल, तर आम्ही तयार आहोत, आमची तयारी पूर्ण झाली आहे,’ असा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीदरम्यान व्यक्त केला.

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात एका हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी हा निर्धार व्यक्त केला. बैठकीला माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, भाऊ चौधरी, आमदार अर्जुन खोतकर, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, संजनाताई जाधव, विलास भुमरे, पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप, शिल्पाराणी राजपूत यांची विशेष उपस्थिती होती.
    मुहूर्त ठरला! पुणे-नागपूर वंदे भारत सुस्साट; प्रवाशांचे 3 तास वाचणार, कोणत्या स्थानकांवर थांबे? कधी सुरु होणार?
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात पक्षाची सध्याची स्थिती काय आहे? सदस्य नोंदणी किती झाली आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कशी तयारी आहे? याबाबत सामंत व अन्य नेत्यांनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
    पुढील २४ तास महत्त्वाचे! राज्यात मेघगर्जनेसह सरींची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांत अ‍ॅलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?
    ‘स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमच्यासाठी झेंडे लावले आणि आम्हाला निवडून आणले. आता आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत आणि त्यांना निवडून आणणार आहोत,’ असा विश्वास बैठकीत नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. ‘काम करा, प्रभाग रचनेवर लक्ष ठेवा,’ अशी सूचनाही पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. या बैठकीत युतीबद्दल मात्र काहीही ठोस भूमिका मांडण्यात आली नाही.
    नाशकात चारशेवर बालके कुपोषित; आदिवासी भागात स्थिती गंभीर, 3100 बालके मध्यम श्रेणीत
    पदाधिकाऱ्यांनी या बैठकीबद्दल समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारच्या बैठका दर दोन महिन्यांनी व्हाव्यात अशी अपेक्षादेखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा