• Tue. Jun 9th, 2026
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘माधुरी’ विषयी चर्चा केली, काय झालं बैठकीत?

    Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर नांदिणीच्या महादेवी हत्तीणी संदर्भात महत्त्वाचे ट्विट केले आहे. त्यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या महादेवी हत्तीणीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली. वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याचे सांगितले. आणि या चर्चेचा परिणाम सकारात्मक असल्याचे समजते.

    मुख्यमंत्र्यांनी काय केले ट्विट?

    “वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.”

    बातमी अपडेट होत आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कन्सलटंट म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा