Chhagan bhujbal On Raj-Uddhav Thackeray: भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाची ताकद वेगवेगळी आहे.
सर्वच कार्यकर्त्यांना उमेदवारीची अपेक्षा असते असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीत काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी वेगळे लढू, या विधानाचा भुजबळांनी दाखला दिला. प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची मनस्थिती अशीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाविषयी विचारले असता, भुजबळ म्हणाले, लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आंदोलन करू शकतो, मात्र जरांगे आता कशासाठी आंदोलन करताहेत, हे काही कळाले नाही. कारण मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले असून, राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत डान्स बार बंद आहेत. डान्स बार आपल्याकडे नकोत, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे कोणी असे प्रकार करीत असेल, तर ते थांबले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य करणे यावेळी भुजबळांनी टाळले.
असा राग काय कामाचा? क्लासमध्ये किरकोळ वाद अन् दहावीतील विद्यार्थ्याचा गेला जीव, दोन मित्र ताब्यात
मंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मला सातपुडा निवासस्थान देण्यात आले.आता राहायला जायचे म्हटल्यावर एखादे घर खाली असेल, तरच आपण जाऊ शकतो. तेथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मला दिलेल्या बंगल्यात राहणारे आमचेच सहकारी आहेत. मी अजून त्यांना एका शब्दानेही बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. बंगला खाली झाला की, राहायला जाईन, असे अजितदादांना सांगितले आहे. ते माझेच सहकारी असल्याने तक्रार करणार नाही. उलट दुसरे छोटे घर मिळाले तरी हरकत नाही. यावर मी जास्त चर्चा करणार नाही, असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार; 29 ऑगस्टला आंदोलकांसह मुंबईत धडकणार
त्यांना घरातून कसे बाहेर काढणार ?
मंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मला सातपुडा निवासस्थान देण्यात आले. आता राहायला जायचे म्हटल्यावर एखादे घर खाली असेल, तरच आपण जाऊ शकतो. तेथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मला दिलेल्या बंगल्यात राहणारे आमचेच सहकारी आहेत. मी अजून त्यांना एका शब्दानेही बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. बंगला खाली झाला की, राहायला जाईन, असे अजितदादांना सांगितले आहे. ते माझेच सहकारी असल्याने तक्रार करणार नाही. उलट दुसरे छोटे घर मिळाले तरी हरकत नाही. यावर मी जास्त चर्चा करणार नाही, असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; आता मत्स्य व्यावसायिकांनाही मिळणार शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज, कसा होणार फायदा?
भुजबळ म्हणाले…
महायुतीतही निवडणूक लढविण्याविषयी स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय
जरांगे कशासाठी आंदोलन करीत आहेत, कळाले नाही
डान्स बार सुरू असतील तर ते थांबले पाहिजेत
बंगला खाली झाला की रहायला जाईन

