Mumbai BEST Bus: ५ हजार ९९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. संपाबाबतचा अंतिम निर्णय ७ ऑगस्टला संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बैठकीत होणार आहे.
भाडेतत्वावरील बसगाड्यांवर चालक हा कंपनीचा आणि वाहक ‘बेस्ट’चा आहे. तर भाडेतत्ववरील ‘बेस्ट’ची देखभाल करण्यासाठीही काही आगारांत कंत्राटी यांत्रिकी कर्मचारी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाडेतत्वाच्या बसवरील चालकासह कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यासाठी संप पुकारत आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ सेवा बंद होत असताना प्रवाशांचे हाल होत आहेत.
Maharashtra Politics: वादग्रस्त मंत्र्यांना वाचवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी; संजय शिरसाट, योगेश कदम यांना अभय
भाडेतत्वावरील बस कर्मचाऱ्यासाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने आता समान कामाला समान दाम मिळाले पाहिजे या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्याआधी या मागणीसाठी संप करावा की नाही म्हणून ८ जुलैला देवनार आगार, शिवाजीनगर आगार, घाटकोपर आगार, मुलुंड आगार आणि मुंबई सेंट्रल आगार येथे कर्मचारी युनियनतर्फे सकाळी सात वाजल्यापासून मतदान घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आगारामध्ये २२ जुलैला मतदान केले. तर ३१ जुलैला त्याची मतमोजणी करण्यात आली.
महापालिकेच्या 25 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्घृणपणे संपवलं; जीव गेल्यानंरतही थांबले नाहीत, दगडाने…
१६ आगारांमध्ये कंत्राटी बस कर्मचाऱ्यांचे मतदान पार पडले. ५ हजार ९९८ कंत्राटी कर्मचारी निवडणुकीत सहभागी होणार होते. प्रत्यक्षात ५ हजार ५१ कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. त्यापैकी ४ हजार ९८६ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. तर सात कर्मचाऱ्यांनी संप नको, यासाठी मतदान केले. ५८ मते बाद झाली आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्याने याबाबतचा निर्णय ७ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.
Mumbai Crime: तीन लग्नं मोडली, प्रेग्नंट होताच चौथा तरुणही पळाला, दुर्धर आजारी महिलेचं भयंकर कृत्य, 6 महिन्याच्या लेकराला…
‘बेस्ट’ उपक्रमाच्या परिवहन विभागात कायम सेवेत असलेले आणि पटावर असलेले कर्मचारी-कामगार करत असलेले काम आणि भाडेतत्वारील बेस्ट बसवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम तंतोतंत सारखेच असल्याने कंत्राटी कर्मचारी-कामगारांना समान कामाला, समान दाम मिळालेच पाहिजे, असे संघर्ष समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
याआधी संपामुळे हाल
२५ फेब्रुवारी २०२५ ला बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन या मागण्यांसाठी संप पुकारला होता. यामध्ये भाडेतत्त्वावरील ३० टक्के बस गाड्या प्रवाशांच्या सेवेत न आल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.

