Akola Congress : अकोलामधून काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार राहिलेले अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं (फेसबुक) समाज माध्यमावर पोस्ट केलं आहे. अभय पाटील यांच्या स्वरूपात काँग्रेसला मिळालेल्या चेहऱ्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकावर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभय पाटील हे जिल्ह्यातील कार्यकारणीवर नाराज असल्याचं समजते. अभय पाटील यांनी सध्या लेखी स्वरूपात आपला राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर त्यांनी आपण राजीनामा दिल्याचं म्हंटलं आहे. दरम्यान, याबाबत पाटील यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. मात्र या राजीनाम्याला राजकीय किनार असल्याचं बोललं जातं आहे.
अभय पाटील काय म्हणाले?
अभय पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसवर माझी काही नाराजी नाही. याउलट त्या पक्षाने मला लोकसभेचं तिकीट देवून इतक्या वरच्या लेव्हलला आणलेलं आहे. पण जे काही मागच्या काही वर्षांपासूनचं राजकारण आहे, मी व्यवसायात नव्हतो, समाजकारणात होतो. त्यामुळे काही घरघुती प्रोब्लेम्स झालेले आहेत. काही घरगुती अडचणी निर्माण झाली आहेत. अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे”, अशी भूमिका अभय पाटील यांनी मांडली.”माझ्याकडे दुसरे काही साधणं नाहीत. मलाही घर परिवाराची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने मी पक्षाला तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मला वाटत होतं की, आपण पक्षावर अन्याय करतोय. आपली जागा मोकळी करुन कुणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी एवढाच विचार होता”, असं अभय पाटील यांनी स्पष्ट केलं.
“राजकीय संन्यास, अलिप्त राहणे, सामाजिक काम आधीपासून करत होतो. आमच्या घराची परंपरा होती. वडील सुद्धा समाजिक चळवळीत होते. विचारधारेची लढाई, सामाजिक लढाई, आपल्या व्यवसायातून लोकांना जी मदत करता येईल ती चालू ठेवेन”, असं अभय पाटील यांनी सांगितलं.
“मी पदासाठी राजीनामा दिलेला नाही. मी 2014 पासून सातत्याने काँग्रेस पक्षासाठी काम करत आहे. मी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे घरगुती समस्या निर्माण झाल्या आहेत”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा