Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut: हिंमत असेल तर नावे घेऊन आरोप करावे, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना केले.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘सरकारवर आरोप करताना किंवा बोलताना थोडा विचार करावा. टोमणे मारणे योग्य नाही. आकडेवारी सांगून काय होणार? ७५ टक्के मंत्र्यांबद्दल त्यांना आक्षेप असेल तर त्यांनी नावे घ्यावीत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी ओबीसी समाजावर कायम अन्याय केला. पन्नास वर्षे सत्तेत असताना समाजाला न्याय न देता उलट ओबीसींच्या मतांचा वापर करून घेतला. जातनिहाय जनगणनेला राहुल गांधींनी दिलेले समर्थन म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.’
कोकाटेंना डच्चू, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार? अजितदादाचं मोठं वक्तव्यकॅबिनेट आणि राज्यमंत्री फार वाद नाही. आम्ही काही अधिकार राज्यमंत्र्यांना देत आहोत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे, याबद्दल विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यासंदर्भात कॅबिनेट मंत्र्यांना विचारणा केली आहे. सर्व कॅबिनेट मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्यांना काय अधिकार देत आहेत, हे सांगणार आहोत. महसूल विभागात तीन हजारांहून अधिक सुनावणी राज्यमंत्र्यांकडे सोपवली आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
Nashik Politics: बागूल, राजवाडेंचा आज भाजपप्रवेश; काँग्रेस, ‘उबाठा’च्या पदाधिकाऱ्यांच्याही प्रवेशाचा दावा
मंत्रिमंडळात बदल करण्याबाबतचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील अधिकार त्या पक्षाच्या नेत्यांचा आहे. मात्र, त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल मते खराब होतील, असे वागणे योग्य नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी आम्ही सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता, ‘त्यांना दिवसभर मीडियात राहायचे असेल, म्हणून त्यांनी फुसकी मारण्याचा प्रयत्न केला. फोन टॅप करण्यासाठी खूप सोपस्कार करावे लागतात, असे कोणाचेही फोन कोणाला टॅप करता येत नाहीत’, असे सांगून बावनकुळे यांनी फोन टॅपची शक्यता फेटाळून लावली.

