Sanjay Raut on CM Fadnavis and Ekdam Shinde : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भ्रष्ट मंत्र्यांच मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचं म्हटलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांनी अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीज कंपनीला नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप करत राऊतांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
‘राज्यात अमित साळुंखेचा, सुमित फॅसिलिटिजचा विषय सुरू असून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला, खासदाराला अटक करुन घेऊन जातील. हे गंभीर प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटिज हा विषय वाटतो तितका सोपा नाही. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे’, असं राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मंत्रिमंडळातून 4 मंत्री जाणार, नावांसह कारणंही सांगितली; CMच्या दिल्लीवारीचा हेतू काय? राऊतांनी सगळंच सांगितलं
‘ही कंपनी कोणाची आहे? श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन, उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र मेडिकल फाऊंडेशन चालवतात. सामाजिक सेवा करतात, या मेडिकल फाऊंडेशनमधला पैसा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे. अमित साळुंखेच्या कंपनीला, सुमित फॅसिलिटिजला मोठ-मोठी कॉन्ट्रॅक्ट गैरमार्गाने देण्याचं काम शिंदे पिता-पुत्रांनी केलं आहे. ८०० कोटींचं टेंडर, १०८ क्रमांकाची अॅम्बुलन्स प्रकरणात घोटाळा समोर आला. या सुमित फॅसिलिटिजला शिंदे पिता-पुत्राने टेंडर, कॉन्ट्रॅक्टसाठी कशी मदत केली, कल्याण-डोंबिवलीमधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राने सुमित फॅसिलिटीजला ८५० कोटींना दिलं’, असं म्हणत राऊतांनी उपमुख्यमंत्री शिदेंवर निशाणा साधला आहे.
Yogesh Kadam : मातोश्रींचा डान्स बार गृहराज्यमंत्र्यांना भोवणार? राऊत म्हणाले उचलबांगडी फिक्स, योगेश कदम म्हणतात तुमचा…
‘सुमित फॅसिलिटीजमागे नाव अमित साळुंखे असलं, तरी यामागे नक्की कोण आहे, मूळ कंपनी कोणाची आहे? या कंपनीला इतकी कॉन्ट्रॅक्ट कशाप्रकारे मिळतात? याचे सुत्रधार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला येतो आणि हा पैसा सामाजिक कार्यात ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा कार्यक्रम चालतो. ही गंभीर बाब आहे.’
वाईट कामांची यादी वाचली, टीका नव्हे पण सल्ला म्हणत ठाकरे फडणवीसांसाठी मनभरुन बोलले!
‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतलं ८५० कोटींचं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट, त्यातून मिळालेले लाभ कोणाच्या खात्यात गेले, हे पाहाण्यासाठी फडणवीसांनी एक एसआयटी स्थापन करावी. त्यांना एसआयटी स्थापन करण्याचा छंद आहे. त्या एसआयटीचं पुढे काय होत माहिती नाही, मात्र इथे एसआयटी स्थापन करुन कालमर्यादा द्यावी असं असंही राऊत म्हणाले. या घोटाळ्यात अटक झाल्यानंतर हे प्रकरण ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंभीनाक्यापर्यंत जाण्याची खात्री आहे त्यामुळे सावध राहा’, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

