• Fri. Jun 12th, 2026
    त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी नक्की वाचा, VIP दर्शनाबाबत मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय

    Trimbakeshwar Temple Nashik: श्रावण महिन्यामुळे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात गर्दी वाढली आहे. प्रशासकीय नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून व्हीआयपी दर्शनबाबत मोठा निर्णय संस्थानाने घेतला आहे.

    trimbakeshwar temple2 (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: श्रावण महिन्यास सुरुवात झाल्याने असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंचवटीतील श्री कपालेश्वर आणि त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंग मंदिरात गर्दी वाढली आहे. प्रशासकीय नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून श्रावणी सोमवारी या दोन्हीही मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय संबंधित संस्थानांनी घेतला.

    श्री कपालेश्वर देवस्थानचे धार्मिक व पौराणिक महत्त्व मोठे आहे. नंदीशिवाय असणारे हे महादेवाचे एकमेव मंदिर मानले जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. श्रावणात गर्दीत भर पडत असल्याने प्रशासनावर नियोजनाचा मोठा तणाव निर्माण होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे पत्र श्री कपालेश्वर देवस्थानचे प्रशासक वि. भा. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर, त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीनेही याच धर्तीवर निर्णय घेत प्रशासनाला माहिती कळविली आहे.
    नाशकात विवाहितेचं टोकाचं पाऊल; दोन लेकरांना मिठीत घेऊन विहिरीत मारली उडी, काय कारण?
    प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन
    नाशिक :
    २८ जुलै रोजी पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने मंदिर प्रशासनासह जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाच्या वतीनेही गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, सरदार चौक, रामसेतू पूल परिसरात पोलिस बंदोबस्तासह आवश्यक तेथे बॅरिकेडिंग केले जाईल. त्र्यंबकमध्येही प्रशासनाने तयारी केली आहे. मंदिर व्यवस्थापन, पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही आदी नियोजन केले आहे.
    प्रहारच्या पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; कामगार उपायुक्त कार्यालयासमोरच अंगावर ओतलं पेट्रोल, नाशिकमधील घटना
    श्रावणी सोमवारसाठी ३३ जादा बस
    नाशिक :
    त्र्यंबक येथील ब्रह्मगिरी पर्वताला श्रावणी सोमवारी फेरी मारण्यासाठी गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २८ जुलै, ४ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट या सोमवारी ३३ जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस नवीन बस स्टँडवरून त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. नाशिक -त्र्यंबक मार्गावर दररोज १६० फेऱ्या होतात. त्याव्यतिरिक्त या ३३ बस धावतील. यापैकी २५ बस नाशिकमधून, ५ बस इगतपुरीतून तर ३ जादा बस पेठ येथून सोडण्यात येणार आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी ११ ऑगस्टला स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा