• Sun. Jun 14th, 2026
    सर्वसामान्यांना स्वस्त घरांची लॉटरी! राज्याचे गृहनिर्माण धोरण जाहीर; २०३०पर्यंत मिळणार पर्यावरणपूरक घरे

    Maharashtra Housing Policy 2025: वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प ‘एसआरए’मार्फत ताब्यात घेऊन पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात घेतला आहे.

    maharashtra housing policy AI (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई: राज्याचे गृहनिर्माण धोरण – २०२५ बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार सन २०३०पर्यंत राज्यातील सर्वांना पर्यावरणपूरक घरे देण्याचे नियोजन आहे. सन २०२६पर्यंत जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि या सर्वेक्षणाच्या आधारे राज्यात सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक घरे बांधण्याची योजना आखली जाईल. या धोरणात सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भाडेकराराने घरे आणि वॉक टू वर्क यावरही लक्ष केंद्रीत केले आहे.

    रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांकडेही (एसआरए) धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प ‘एसआरए’मार्फत ताब्यात घेऊन पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात घेतला आहे. त्याशिवाय पुनर्विकास प्रकल्पात तीन वर्षांचे आगाऊ भाडे एस्क्रोमध्ये म्हणजे बँक किंवा तत्सम तृतीय पक्षाकडे जमा करावे लागणार आहे.
    Rain Alert: मुंबई, ठाणे, पालघरला आज मुसळधार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, कुठे कोणता ॲलर्ट?
    यापूर्वीचे गृहनिर्माण धोरण सन २००७मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर २०१५ व २०२१मध्ये गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. आता नवीन गृहनिर्माण धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे गृहनिर्माण धोरण तयार करताना गृहनिर्माण विभागाने एसआरए, म्हाडा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध संघटना, विकासक, या विषयातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून हे नवीन गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले आहे. सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य गृहनिर्माण धोरण तयार करण्याच्या प्रस्तावास मे महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे धोरण करण्यापूर्वी वित्तीय क्षेत्रातील आघाडीच्या बँका, बँकेतर वित्तीय संस्थांशी सखोल चर्चा करण्यात आली. धोरण जाहीर करण्यापूर्वी हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार, सुमारे १,८०० हरकती-सूचना आल्या होत्या.

    राज्य पुनर्विकास निधीची स्थापना
    अनेकदा पुनर्वसन प्रकल्प सुरू असताना विकासकाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्प रखडतो. अशा प्रकल्पांना आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठी राज्य पुनर्विकास निधीची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस या धोरणात करण्यात आली आहे. हा निधी विकासकाला न देता या निधीचा वापर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करावा. हा निधी पुनर्विकासाच्या विक्री घटकातून प्राधान्याने वसूल करण्याची सूचना या धोरणात आहे.
    Vijay Wadettiwar: बाबू धीरज रखो, सब ओपन होगा; ‘हनी ट्रॅप’प्रकरणावरुन वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा
    प्रकल्पानजिक राखीव जमीन
    समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा अशा महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प सुविधांना लागून असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी दहा ते पंधरा टक्के सुयोग्य जमीन राखीव ठेवण्यात येणार आहे.
    Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहि‍णींचा हफ्ता लवकरच बंद होणार? सरकार आवळा देऊन कोहळा काढण्याच्या तयारीत
    अपात्र झोपडीधारकांना घरे
    धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत प्रथमच झोपडपट्टीतील अपात्र रहिवाशांना परवडणारी भाड्याची घरे देण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांसह स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. धारावीतील अशा भाडेतत्त्वावरील प्रयोगाची पुनरावृत्ती इतर ठिकाणी करण्यात येणार आहे.

    धोरणाची ठळक वैशिष्ट्ये

    • परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी, परवडणारी भाड्याने मिळणारी घरे आणि वॉक टू वर्क या घटनांवरदेखील लक्ष देणार
    • रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांकडे (एसआरए) विशेष लक्ष
    • रखडलेले प्रकल्प एसआरएमार्फत ताब्यात घेऊन पूर्ण करण्यात येणार
    • समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आदी पायाभूत प्रकल्प सुविधांजवळच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी १० ते १५ टक्के जमीन राखीव ठेवणार
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा