• Wed. Jun 17th, 2026

    Jalgaon News: जळगावात पालघरची पुनरावृत्ती टळली; साधूंच्या कपड्यात असलेल्या दोघांना नागरिकांची मारहाण, कारण काय?

    Jalgaon News: जळगावात पालघरची पुनरावृत्ती टळली; साधूंच्या कपड्यात असलेल्या दोघांना नागरिकांची मारहाण, कारण काय?

    Jalgaon Crime News: पालघर येथे काही वर्षांपूर्वी साधूंना मारहाण करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना जळगावात घडता घडता राहिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    निलेश पाटील, जळगाव : पालघर येथे साधू वेशात असलेल्या व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता रावेरात बघायला मिळाली आहे. येथे मुलं पळवून नेण्याच्या बहाण्याने साधूंच्या कपड्यात असलेल्या दोन जणांना नागरिकांनी चांगलीच मारहाण केली आहे. मात्र, लागलीच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केल्याने या दोन जणांचा जीव वाचला आहे.

    लहान मुलं चोरणाऱ्या टोळीतील असल्याची अफवा

    सिरसा (हरियाणा) येथील जडीबुटी विक्रेते आणि साधू – जस्सानाथ पुनुनाथ (वय 60) व मोनूनाथ जस्सानाथ (वय 20) – सध्या मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहत असून, ते जडीबुटी विक्रीसाठी मुंजलवाडीत आले होते. त्यांनी एका ग्रामस्थाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अफवा पसरली की ते बालचोर टोळीतील आहेत. यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली.ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना HR13E6516 क्रमांकाच्या गाडीतून निघाले, मात्र कुसुंबा आणि लोहारा येथे पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान त्यांच्या गाडीची तोडफोड देखील झाली.
    Jalgaon News: मारुतीच्या दर्शनाला जाताना डंपरची जोरदार धडक, तरुणाचा जागीच अंत; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

    पोलीस वेळेवर पोहोचले; परिसरातील तणाव नियंत्रणात

    घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य गंभीर परिणाम टळला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

    दोन तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

    या प्रकरणात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीत इकबाल मोहंमद तडवी यांनी वाहनाचा कट लागल्याचा उल्लेख केला असून दुसरी तक्रार जडीबुटी विक्रेत्यांच्या वतीने मारहाण करणाऱ्यां विरोधात दाखल होणार आहे.

    अफवांवर विश्वास ठेवू नका – पोलिसांचे नागरिकांना आवाहन

    अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी लेवाजगत शी बोलताना सांगितले, “जस्सानाथ आणि मोनूनाथ हे साधू नसून हरियाणामधून आलेले आहेत. सध्या ते मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहून जडीबुटी विक्रीचे काम करतात. कोणतीही अफवा पसरवू नका आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.”

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा