Jalgaon Crime News: पालघर येथे काही वर्षांपूर्वी साधूंना मारहाण करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना जळगावात घडता घडता राहिली आहे.
लहान मुलं चोरणाऱ्या टोळीतील असल्याची अफवा
सिरसा (हरियाणा) येथील जडीबुटी विक्रेते आणि साधू – जस्सानाथ पुनुनाथ (वय 60) व मोनूनाथ जस्सानाथ (वय 20) – सध्या मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहत असून, ते जडीबुटी विक्रीसाठी मुंजलवाडीत आले होते. त्यांनी एका ग्रामस्थाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अफवा पसरली की ते बालचोर टोळीतील आहेत. यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली.ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना HR13E6516 क्रमांकाच्या गाडीतून निघाले, मात्र कुसुंबा आणि लोहारा येथे पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान त्यांच्या गाडीची तोडफोड देखील झाली.
Jalgaon News: मारुतीच्या दर्शनाला जाताना डंपरची जोरदार धडक, तरुणाचा जागीच अंत; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
पोलीस वेळेवर पोहोचले; परिसरातील तणाव नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य गंभीर परिणाम टळला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दोन तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीत इकबाल मोहंमद तडवी यांनी वाहनाचा कट लागल्याचा उल्लेख केला असून दुसरी तक्रार जडीबुटी विक्रेत्यांच्या वतीने मारहाण करणाऱ्यां विरोधात दाखल होणार आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका – पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी लेवाजगत शी बोलताना सांगितले, “जस्सानाथ आणि मोनूनाथ हे साधू नसून हरियाणामधून आलेले आहेत. सध्या ते मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहून जडीबुटी विक्रीचे काम करतात. कोणतीही अफवा पसरवू नका आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.”

