• Tue. Jun 16th, 2026

    धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

    धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खळबळजनक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुले लुळेपणा आणि अशक्तपणामुळे त्रस्त आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गावात सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचे स्रोत बंद केले असून जनजागृती केली जात आहे.

    धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुलांना लुळेपणा आणि अशक्तपणा आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. अडीच वर्षांचा एक, नऊ वर्षांचा दुसरा आणि अकरा वर्षांचा तिसरा मुलगा, अशा तिघांना छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गावात सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नये, काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खंबाट वस्तीमध्ये तीन मुलांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणाची लक्षणे दिसली. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभाग तातडीने कामाला लागला आहे. दोन दिवसांपूर्वी एका मुलालाही लक्षणे जाणवली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार त्याला जीबीएस (GBS) नसावा. त्यानंतर आणखी दोन मुलांना अशीच लक्षणे दिसली. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे त्यांनाही जीबीएस नसावा, असा अंदाज आहे.

    Chhatrapati Sambhajinagar: अनधिकृत बांधकामांचा पंचनामा नाहीच, थेट तोडफोड! मोबदल्यासाठी आता होणार बाधितांचे हाल

    या घटनेनंतर खंबाट वस्तीत सर्वेक्षण सुरू केले आहे. पाण्याचे स्रोत बंद केले आहेत. जवळपासच्या गावांमध्येही सर्वेक्षण सुरू असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.”

    आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही बालकांची प्रकृती सुधारत आहे. पहिल्या मुलामध्ये सुधारणा पाहता त्याला जीबीएस नसावा, असा अंदाज आहे. इतर दोन मुलांमध्येही सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनाही जीबीएस नसेल, असे वाटते. खबरदारी म्हणून आरोग्य विभाग पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा