Thane Crime: दिवा स्थानकात पहाटेच्या वेळी एका महिलेची मालगाडीखाली ढकलून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, रेल्वे स्थानकांची सुरक्षा आजही वाऱ्यांवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
फलाट क्रमांक ५ आणि ६वर राजन सिंगचा एका महिलेसोबत वाद झाला. नंतर तो तिच्यासोबत कल्याण दिशेकडे चालत गेला. तिचा पाठलाग करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने त्याला प्रतिकार केला असता, आरोपीने मालगाडी येत असताना तिला ढकलले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
घटनेनंतर राजन रुळांमधून चालत जात असताना रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात हत्या, विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यात राहणारा राजन अविवाहित असून तो गाडी चालवण्याचे काम करतो. हा प्रकार घडला, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मृत महिला बाटल्या गोळ्या करण्याचे काम करत असे. तिची अद्याप ओळख पटली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले
नेमकं काय घडलेलं?
आरोपीचा महिलेशी वाद सुरू झाला
त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला
महिलेने प्रतिकार करताच मालगाडी येताच तिला ढकलले
Pune Crime: इंजिनिअरिंगचा ‘टॉपर’ निघाला चोर; पुण्यात दागिने चोरुन कर्नाटकला पळालेला, ‘असा’ अडकला जाळ्यात
दिव्यात महिलेच्या हत्येच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
दिवा स्थानकात पहाटेच्या वेळी एका महिलेची मालगाडीखाली ढकलून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, रेल्वे स्थानकांची सुरक्षा आजही वाऱ्यांवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दररोज मोठ्या संख्येने मेल, एक्स्प्रेसह लोकमधून नागरिक प्रवास करत असतात. प्रत्येक स्थानकामध्ये प्रवाशांची वर्दळ असल्याने स्थानकाची, तसेच स्थानक परिसरातील सुरक्षा अधिक कडक असणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे सुरक्षा यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

