Four People Drowned In Sea : रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात एक दुर्दैवी अपघात झाला. एका जोडप्यासह त्यांच्या दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे जोडपे ओसवाल नगरचे होते, तर भावंडे मुंब्राहून पाहुणे म्हणून आले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने आतमध्ये ओढले गेले
रत्नागिरीपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ठाणेमुंब्राहून उज्मा शेख (१८) आणि उमेरा शेख (२९) रत्नागिरीला नातेवाईकांकडे आले होते. शनिवारी सायंकाळी ते दोघे जैनब काझी (२६) आणि जुनैद काझी (३०) यांच्यासोबत समुद्रावर गेले. हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. समुद्रात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या या चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते आतमध्ये ओढले गेले आणि समुद्रात बुडाले.
Jalgaon News: मारुतीच्या दर्शनाला जाताना डंपरची जोरदार धडक, तरुणाचा जागीच अंत; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
शासकीय रुग्णालयात स्थानिकांची गर्दी
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्थानिकांच्या आरडाओरडा लक्षात येताच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र कदम आणि राजेंद्र यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उशिरापर्यंत घटनेची नोंदणी केली. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Raigad News : धडाम्sss! ब्रेक फेल झाल्याने माथेरानच्या घाटात इको आणि इनोव्हाची जोरदार धडक, बदलापूरचं कुटुंब थोडक्यात बचावलं, पण…
शहरात हळहळ
दुपारपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला आहे. अशा स्थितीत रत्नागिरी शहराजवळील आरे वारे समुद्रात चौघेजण बुडाल्याची ही दुर्घटना घडली. सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत ठाणे मुंब्रा येथे झालेल्या दोन भावंडांचाही समावेश आहे. रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे राहणाऱ्या पती-पत्नीचा ही यामध्ये समावेश आहे. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
दुसरीकडे, रायगडातपर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मुरुड तालुक्यातील फणसाड धरण येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील पाझर तलावात गोवंडी येथून आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीआहे.

