Hemant Godse: गोडसे यांनी बुधवारी स्वपक्षावरच हल्लाबोल करून एकप्रकारे त्यास दुजोराच दिला आहे. पक्षाचे मंत्री संघटनेसाठी उपयुक्त ठरत नसल्याची टीका करून त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाव न घेता अंगुलीनिर्देश केला आहे.
ठाकरे गटापाठोपाठ भाजपने आता राज्यात सत्तेतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही धक्का देण्याची तयारी चालवली आहे. गोडसे यांचे ताजे आरोप त्याच मोहिमेचा भाग असल्याचेही मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची करून पक्षातून विरोध असतानाही गोडसेंनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर गोडसे सक्रिय राजकारणापासून काहीसे दुरावले. ते शिवसेनेत अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली. पक्ष संघटनेतही त्यांना फारसे विचारले जात नाही. त्यात शिंदे गटात नाशिकमध्ये दोन गट असल्याने गोडसे यांची कोंडी झाल्याचेही बोलले जाते. त्यामुळे नाराज गोडसे यांनी आता उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करतानाच, संघटनेच्या कामकाजावर मात्र तोफ डागली.
उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात; जुलैअखेर दोन दिवसीय दौरा, निवडणुकांचे रणशिंग फुंकणार
शिंदे गटात पक्षांतर्गत शिस्त नसल्याचे सांगत आपण नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, शिंदेंनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. पण पक्षांतर्गत शिस्त नाही. पदवाटप आणि संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये योग्य व्यवस्थापन नाही. येणाऱ्या काळात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यासंदर्भातील पक्षपातळीवर तयारी होणे, पक्षात शिस्त असणे गरजेचे आहे. तसे झाले तरच येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळू शकेल,’ असे सांगून गोडसे यांनी पक्षाला घरचा अहेर दिला. ‘या संदर्भात अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे विषय मांडला आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे,’ असे गोडसे यांनी सांगितले. भाजपत जाण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही. या केवळ अफवा आहेत, असे गोडसे यांनी स्पष्ट केले. सन २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे आताच भाजपला पर्याय स्वीकारला तर,ल लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा गोडसें समर्थकांमध्ये आहेत.
Nashik News: सुखाचा संसार, पदरात दोन लेकरं; उच्चशिक्षित दाम्पत्याचा एकाच वेळी जीवन संपवण्याचा प्रयत्न, काय घडलं असं?
पुनर्वसन न झाल्याने दबावतंत्र ?
पक्षाने लोकसभेतील निवडणुकीत पराभूत झालेल्या काही उमेदवारांना विधानसभा आणि विधान परिषदेत संधी दिली. परंतु, गोडसे यांचे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे गोडसे पक्षात अस्वस्थ असून, ते पक्षावर दबाव टाकत असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जातो. हेमंत गोडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी गोडसेंना चर्चेसाठी ठाण्यात पाचारण केल्याचे समजते.
Raj Thackeray : उद्धवजींसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा सूर, तरी राज ठाकरेंचं ‘वेट अँड वॉच’ का? अखेर उत्तर मिळालं
मंत्री दादा भुसेंवर टीकास्र
शिंदे पक्षाचे मुख्य नेते असले तरी ते एकटे काम करू शकत नाहीत. त्यांचा भार कमी केला पाहिजे, असे सांगत जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे, तर संघटना बळकट होते, असे नमूद करत गोडसे यांनी मंत्री दादा भुसेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजे. एखाद्या पक्षात शिस्त असली की गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नको असे सांगत, भुसे यांचे जिल्ह्यात पक्षावर नियंत्रण नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

