• Mon. Mar 16th, 2026

    मोठी बातमी: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाईफेक; स्वामी समर्थांबद्दल…

    मोठी बातमी: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाईफेक; स्वामी समर्थांबद्दल…

    Solapur News: सोलापुरात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे एका कार्यक्रमात काळं फासण्यात आलं. शिवधर्म फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत हे कृत्य केलं.

    मोठी बातमी: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    इरफान शेख, सोलापूर: सोलापुरात खळबळजनक घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. गायकवाड यांनी स्वामी समर्थांबद्दल अपशब्द वापरले, असा आरोप करत हे कृत्य करण्यात आलं आहे. शिवधर्म फौंडेशनच्या शिवभक्तांनी हे कृत्य केले. एका नागरी सत्कार समारंभात कार्यक्रमात ही घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटमध्ये श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने गायकवाड यांचा सत्कार आयोजित केला होता. तिथेच शिवधर्म फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. यामुळे एकच गोंधळ उडाला.

    शिवधर्म फौंडेशन आणि शिवभक्तांचा आरोप आहे की, प्रवीण गायकवाड यांनी स्वामी समर्थांविषयी अपशब्द वापरले. तसंच संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. त्यामुळे शिवभक्त संतप्त झाले होते. या घटनेनंतर शिवधर्म फौंडेशनने संभाजी ब्रिगेडला इशारा दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. “जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही, तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

    महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी असणारे दोन्ही भाऊ कायम सोबत राहणार? बड्या नेत्याची महत्त्वाची प्रतिक्रिया

    अक्कलकोटमध्ये नक्की काय घडलं?

    गायकवाड एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. हे कृत्य करणारे शिवधर्म फौंडेशनचे कार्यकर्ते होते, अशी माहिती आहे. सदर कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “स्वामी समर्थांच्या भूमीतच संभाजी ब्रिगेड अध्यक्षाचा काळं फासून केलेला निषेध म्हणजेच स्वामींचा दिव्य न्याय आहे.”

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा