प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहेत. काळी दौ. मार्गावर शेतकरी मांगीलाल जाधव यांच्याशी बच्चू कडूंची भेट झाली. शेतकरी मांगीलाल जाधव यांनी आपल्या व्यथा कडूंसमोर मांडल्या. शेतकऱ्याच्या डोळ्यातला राग येत्या निवडणुकीत अंगार होऊन उमटेल, असे शेतकऱ्याने सांगितले.
Bacchu Kadu | मालाला भाव नाही, शेतकरीही विभागलेले; शेतकऱ्याने बच्चू कडूंकडे व्यथा मांडली
