• Mon. Mar 16th, 2026
    एकाचे 10 लिटर… युरिया, चुना, तेल… पडळकरांकडून दूध भेसळीचा डेमो, फडणवीस ॲक्शन मोडवर येत म्हणाले..

    विधीमंडळ परिसरामध्ये राज्यातील दूध भेसळयुक्तीचा डेमो देत आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रश्न मांडला. या मुद्द्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये दिसले. लवकरच मोठी धडक कारवाई करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : विधीमंडळ परिसरात भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधातील भेसळीचा डेमो दाखवला. एक लिटर दुधात भेसळ करून ते कशा प्रकारे १० लिटर केले जाते हे पडळकरांनी माध्यमांसमोर डेमो देत दाखवले. दुधामध्ये युरिया, तेल आणि चुना टाकत कशा प्रकारे भेसळ केली जाते हे दाखवलं. त्यामुळे राज्यातील जनता आरोग्यासाठी पोष्टीक समजून जे पीत आहे ते एक प्रकारे विषच पीत आहे. पडळकरांनी यावेळी जाहीरपणे दाखवलं त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    गोपीचंद पडळकरांनी अत्यंत गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. या दुधाच्या माध्यमातून लोकांना जर विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारण नाही. यासंदर्भात मी स्वत: जो आपला फुड अँड ड्रग्ज विभाग, आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधातील विभागाची बैठक घेणार आहे. एक धडक कारवाई आम्ही करणार आहोत. कायदाही कडक केला जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
    मुंबईत प्रवास होणार सुलभ? रेल्वे-मेट्रोच्या एकत्रीकरणासाठी समिती, स्थानकांना जोडणाऱ्या पुल व भुयारी मार्गांचा प्रस्ताव
    राज्यातील लोकसंंख्येचा विचार केला आणि दुध देणाऱ्या जनावरांची संख्या पाहिली तर जमीन आस्मानचा फरक दिसेल. मग जास्तीचे जे दूध लोकांना पुरवले जाते ते कुठून येते? त्यामुळे भेसळयुक्त दूधात वाढ करून लोकांची गरज भागवली जाते. पण दुधाच्या माध्यमातून लोकांना विष देऊन त्यांच्या जीवासोबत खेळलं जात आहे. दूध हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. शहरातील सर्वसामान्य लोक कष्ट करून आपल्या लहान मुलांना पिशवीतील दूध देतात. मात्र या भेसळीवर सरकार काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Vasai News : वसईत पुलाखाली बाळाचा आवाज, रडण्याच्या दिशेने गेले आणि… कचऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत आढळलं नवजात अर्भक

    संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?

    निश्चित पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील. कोणी तक्रार करण्याची आवश्यकता नाही. काही गुन्हे हे अदखलपात्र असतात तर काही गुन्हे हे दखलपात्र असतात. त्या कॅटेगिरीमध्ये यासंदर्भात कारवाई केली जाईल. शेवटी फोर्स किती वापरला आहे त्यावर तो गुन्हा ठरतो. पोलिसांना कारवााई करू द्या ते योग्य ती कारवाई करतील, असं फडणवीसांनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा