मराठा समाजातील मुलांना जाणिवपूर्वक ओबीसी जात प्रमाणपत्र आणि…जात वैधता प्रमाणपत्र उशिरा दिलं जात आहे असा आरोप जरांगेंनी केला आहे. या बाबत मंत्री संजय शिरसाट यांना चार ते पाच वेळा बोललो आहे. अधिकाऱ्यांना समज द्या नाहीतर आम्हाला राज्यभरातील कार्यालयांना…घेराव घालावा लागेल असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे पाटील हे आज सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर…असलेल्या कारी या गावी चावडी बैठकीसाठी अचानक आले होते.