Parbhani News : परभणी जिल्ह्यातील दहिफळे कुटुंबाने एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. दोन प्राध्यापक भावांनी शेती करणाऱ्या भावाला संपत्तीचा मोठा वाटा दिला, जेणेकरून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. इतकेच नव्हे, तर त्यांनी त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या लग्नाचा खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथे रंगनाथ दहिफळे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. रंगनाथ दहिफळे यांना तीन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. मोठा मुलगा प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब दहिफळे आणि लहान मुलगा प्राध्यापक युवराज दहिफळे हे दोघेही लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहेत. मधला मुलगा हा केशव दहिफळे शेती करतो. कुणाल दहिफळे यांना साडेसहा एकर जमीन, गावात घर आहे. रंगनाथ दहिफळे यांचे वय सध्या 91 वर्ष झाले असल्याने त्यांनी माझ्या डोळ्यात देखत तिन्ही लेकांच्या वाटण्या करण्याचा निश्चय घेतला.
साडे चार हजार शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा, 40 सीएससी केंद्र चालकावर गुन्हा दाखल, मोठा घोटाळा उघड
आपल्या तीनही मुलांना जवळ बसून रंगनाथ दहिफळे यांनी शेतीच्या वाटण्या केल्या. साडेसहा एकर जमिनीपैकी साडेदहा एकर जमीन ही पाण्याखाली पोलीसची जमीन आहे. ती सर्व जमीन शेती करणाऱ्या केशवला देण्यात आली. राहिलेल्या कोरडवाहू सहा एकर जमिनीमध्ये तीन तीन एकर जमीन प्राध्यापक बाळासाहेब आणि प्राध्यापक युवराज यांना देण्यात आली. एवढेच नव्हे तर शेतीत काम करणाऱ्या केशवच्या मुलांचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारी देखील या दोन्ही प्राध्यापक भावांनी उचलली. संपत्तीची वाटणी ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आई-वडिलांसमोर पार पडली.
रंगनाथ दहिफळे यांना वेळोवेळी वाटत असे की आपला मधला मुलगा केशव शेतीत काम करत आहे, त्याच्या मुलांचं शिक्षण मुलीचे लग्न शेतीतील उत्पन्नावर तो कसा करेल. त्यामुळेच त्यांना आपल्या डोळ्यादेखत केशवला संपत्तीतला जास्त वाटा मिळावा असे वाटत होते आणि तसा मानस त्यांनी आपल्या प्राध्यापक दोन्ही मुलांना बोलून दाखवला होता. वडिलांची इच्छा दोन्ही प्राध्यापक मुलांनी मोडली नाही. रंगनाथ दहिफळे यांनी ज्या पद्धतीने शेतीच्या वाटण्या केल्या, त्याला दोन्ही प्राध्यापक भावांनी सहमती दर्शवली. त्यापुढे जाऊन त्यांनी आपल्या भावाच्या मुलांच्या शिक्षणाची आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारी देखील उचलली.
देवेंद्र फडणवीसांचा परभणी दौरा, दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, भाजप मोठी रणनीती आखतंय?
या वाटण्या होत असताना तीनही भावांच्या पत्नी देखील तिथे उपस्थित होत्या. या तीनही जावांनी या वाटण्या केल्यानंतर आनंदाने सहमती दर्शवली. दहिफळे कुटुंबीयांच्या संपत्तीच्या केलेल्या वाटण्याची चर्चा आता जिल्हाभर केली जात आहे. एकीकडे आपण पाहत आहोत की शुल्लक संपत्तीवरून भावाभावामध्ये आणि आई वडील आणि मुलांमध्ये भांडणे होत आहेत. संपत्तीच्या वादावरून खून देखील केले जात आहेत. पण या दहिफळे कुटुंबीयांनी संपत्तीची केलेली वाटणी ही आता समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करणारी आहे.

